वालचंदनगर, ता. १६ : सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे वाचन संस्कृती कमी होत चालली असून, विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त पुस्तके वाचन करण्याचे आवाहन श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक भाऊसाहेब सपकळ यांनी केले.
वालचंदनगर (ता. इंदापूर) येथे भारत चिल्ड्रन्स अॅकॅडमी शाळेमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. यावेळी सपकळ यांनी सांगितले की, ‘‘सध्याचे स्पर्धेचे युग आहे. तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. नवीन पिढी सोशल मीडियाच्या आहारी गेली असून, वाचनाकडे कमी ओढ आहे. वाचनाची सवय कमी होणे समाजासाठी घातक आहे. येणाऱ्या काळामध्ये वाचन संस्कृती वाढविण्यासाठी सर्वांना प्रयत्न करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी वक्तृत्व, निबंध स्पर्धा, वाचन स्पर्धेचे आयोजन करण्याची गरज आहे. पालकांनी मुला-मुलींना पुस्तके वाचण्यासाठी प्रोत्साहन द्यावे.’’ यावेळी प्राचार्य कृष्णदेव क्षीरसागर, सकाळचे वितरण विभागाचे बारामतीचे व्यवस्थापक उमेश थोपटे, पर्यवेक्षक प्रेमा सिंग, प्रचना माळशिकारे आदी उपस्थित होते. पार्वती बनसोडे व सुप्रिया सुरवसे यांनी सूत्रसंचालन, तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गणेश शिंदे यांनी सहकार्य केले.
विद्यार्थ्यांसाठी नवीन उपक्रम सुरू
क्षीरसागर यांनी सांगितले की, वाचन संस्कृती वाढविण्यासाठी शाळेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येतात. शाळेने चालू शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या वाढदिवसाला पुस्तके भेट देण्याचा नवीन उपक्रम सुरू केला असून, याअंतर्गत विद्यार्थ्याला त्याच्या वाढदिवसादिवशी वयानुसार पुस्तक भेट देणार आहे.
WAL25B05492
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.