पुणे

शेतकऱ्यांना संपविण्याचे सरकारचे षडयंत्र : कडू

CD

वालचंदनगर, ता. १२ : ‘‘सत्ता, कार्यकर्ता आणि पैसा हे सरकारचे समीकरण आहे. शेतकऱ्यांना संपविण्याचे सरकारचे षडयंत्र आहे. दररोज राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या करत असून संपूर्ण कर्जमाफी करा. अन्यथा खुर्ची सोडा,’’ अशी टीका प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केली.

भवानीनगर (ता.इंदापूर) येथे रविवारी (ता.१२) शेतकरी कर्जमुक्ती एल्गार सभेमध्ये बोलत होते. यावेळी ते म्हणाले, राज्याचे बजेट साडेसात लाख कोटी रुपयांचे असतानाही वित्तमंत्री अजितदादा सांगतात की, पैशाचे सोंग करता येत नाही. शक्तिपीठ मार्गासाठी ८५ हजार कोटी रुपये देता. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ४८ हजार कोटी रुपये लागतात. पैशाचे सोंग जमत नसेल तर खुर्ची सोडावी. इंदापूरमध्ये कृषिमंत्री व शेजारी वित्तमंत्री असतानाही शेतकऱ्यांच्या उसाला टनाला ६०० रुपये कसे कमी मिळत आहेत. उसामध्ये एकरी २० हजार ते २५ हजार रुपये तोटा असून शेतकऱ्यांच्या उसाला ४२०० रुपये प्रतिटन दर मिळाला पाहिजे..

यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, शेतकरी कर्जमुक्त हक्क समितीचे प्रदेश निमंत्रक विठ्ठल पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम, प्रदेश अध्यक्ष विद्यार्थी रविराणा पवार, डेअरी असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष शहाजी शिंदे, सतीश काटे, अण्णा पाटील, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष मंगेश ढमाळे, रासपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण गोफणे उपस्थित होते.

रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी सांगितले, राज्यामध्ये नैसर्गिक आपत्ती आली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे सरकारने दिलेली मदत ही केवळ तोंडाला पाने पुसण्यासारखी असल्याचे सांगितले.

आमदारांचा पगार २०१० मध्ये ७० हजार होता. आत्ता २.५ लाख रुपये झाला आहे. मंत्र्यांना ३.५ लाख रुपये पगार आहे. कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू झाल्यावर पगार वाढ होईल. मात्र, आजही शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजारभाव मिळत नाही. त्यांचे उत्पन्न वाढत नसून दररोज दररोज आठ ते नऊ शेतकऱ्यांच्या आत्महत्या करीत आहेत.
- बच्चू कडू, अध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष

बच्चू कडू म्हणाले..
- शेतकरी दररोज मरतोय, सरकार कर्जमाफी देत नाही.
- शेतकऱ्यांच्या अस्तिावाची लढाई सुरू आहे.
- सध्या प्रत्येक मतदार संघामध्ये बोगस मतदार
- झेंडे कोणतेही लावा. मात्र, २८ ऑक्टोबरच्या नागपूरमधील आंदोलनाला या

05563

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW, World Cup: भारताचा सलग दुसरा पराभव! एलिसा हेलीच्या ऑस्ट्रेलियाने सर्वात मोठे लक्ष्य पार करत घडवला इतिहास

Mumbai: एसटी संघटनांमध्ये कुरघोडीचे राजकारण! आंदोलनाचे श्रेय घेण्यावरून चढाओढ, उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा सुटणार

Water Taxi: मुंबईतील वॉटर टॅक्सीचे काम कधी पूर्ण होणार? मोठी अपडेट आली समोर, वाचा सविस्तर...

INDW vs AUSW: एलिस पेरी आऊट न होताच गेली मैदानाबाहेर, पण भारताविरुद्ध कर्णधार एलिसा हेलीचं शतक

Kolhapur : आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रकरणात मोठी अपडेट, बहीण-भावानेच केलेलं कांड; मैत्री करत...

SCROLL FOR NEXT