वाल्हे, ता.१६ : वाल्हे (ता.पुरंदर) परिसरामध्ये वळवाच्या पावसामुळे फळबाग व जनावरांच्या चाऱ्याचे नुकसान झाले आहे. तसेच बहुतांश
ठिकाणी घराचे, पोल्ट्री, गोठ्याच्या छताचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याचे महसूल विभागाच्या वतीने नुकसानीचे तत्काळ पंचनामे केले असल्याचे तलाठी संजय उमाप यांनी सांगितले.
वाल्हे परिसरामधील आडाचीवाडी, सुकलवाडी, वागदरवाडी, राख, दौंडज आदी ठिकाणी वळवाच्या पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावत तरकारी पिकांसह जनावरांच्या चाऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच घर, पोल्ट्री, गोठ्याच्या शेडवरील अनेकांचे पत्रे उडून गेल्याने तसेच वादळी वाऱ्याने डाळिंब पिकावरील क्रॉपकव्हर फाटल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वळवाच्या अचानक झालेल्या नुकसानीबाबत नुकसानग्रस्तांना मदत
मिळण्यासाठी त्वरित पंचनामे करण्याची मागणी संदर्भात नागरिकांनी जोर लावला असता महसुल विभागाच्या वतीने परिसरामध्ये प्रत्यक्ष जागेवर जाऊन
पंचनामे कऱण्यात आले.
पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांनी दिलेल्या सूचनेनुसार वाल्हे परिसरामधील ठिकठिकाणी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पंचनामे पूर्ण करून, त्याबाबतचा अहवाल वरिष्ठांना सादर केला असल्याची माहिती तलाठी संजय उमाप यांनी दिली. यावेळी कोतवाल आनंद पवार, मोहन पवार, नितीन पवार, कैलास पवार उपस्थित होते.
03015
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.