वाल्हे, ता. १८: वाल्हे (ता.पुरंदर) येथील रामायणकार महर्षी वाल्मिकीऋषी संजीवन समाधी मंदिराशेजारील प्रांगणामधील महावितरणच्या रोहित्राची दुरवस्था झाली आहे. जमिनीलगत असलेल्या उघड्या रोहित्रामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यादरम्यान याठिकाणी मोठ्या प्रमाणावर वारकऱ्यांच्या राहुट्या उभारल्या जातात. उघड्या व कमी उंचीच्या रोहित्रामुळे या भागातून ये-जा करणाऱ्यांच्या जीवितास संभाव्य धोका निर्माण झाला आहे. विजेच्या झटक्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
वीज वितरण कंपनीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून रोहित्र तसेच तारांच्या दुरुस्तीकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याचे दिसून येते. पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होऊ नये तसेच दुर्घटना होऊ नये यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. परंतु वीज वितरण कंपनीचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी शेतशिवारात देखील दरवाजा तुटलेले उघड्या असलेल्या डीपीच्या ग्रीपच्या ठिकाणी धोकादायक बांधलेल्या तारा असे काहीसे दृश्य दिसून येत आहे. महर्षी वाल्मिकी परिसरातील मैदानावर लहान बालके खेळत असल्याने पावसाळ्याच्या दिवसात धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, पालकी सोहळ्यापूर्वी तत्काळ हा धोकादायक रोहित्र येथून स्थलांतर करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. लाईनमनसह अधिकाऱ्यांना हा कमी उंचीचे रोहित्र दिसले नाही का असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. वीज ग्राहकांकडून वसुलीबाबत आग्रह केला जातो. मात्र विजेच्या समस्या सोडविण्याबाबत महावितरणकडून होत असलेली दिरंगाईकडे वरिष्ठांकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याची
खंत शेतकरी उमेश पवार यांसह शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
04694
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.