पुणे

भारत इतिहास संशोधन मंडळात ‘पानिपतचा रणसंग्राम’वर व्याख्यान

CD

पुणे, ता. ९ ः इतिहासातील पराक्रमाच्या स्मृती जपणे, त्यातून धडा घेणे गरजेचे असते. इतिहासाचा अभ्यास करणे राष्ट्राच्या जिवंतपणासाठी महत्त्वाचे असते, असे मत इतिहास अभ्यासक व वक्ते अॅड. रवींद्र यादव यांनी व्यक्त केले. पानिपतवीर मानाजी पायगुडे सभेतर्फे पानिपत स्मृतिदिनानिमित्त आयोजित ‘पानिपतचा रणसंग्राम’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.

भारत इतिहास संशोधन मंडळ येथे झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षपद इतिहास अभ्यासक अभिजित आंबेकर यांनी भूषविले. या वेळी यादव यांनी पानिपतच्या युद्धाचा इतिहास त्यातील बारकाव्यांसह ओघवत्या आणि रसाळ शब्दांत कथन केला. यादव म्हणाले, ‘‘पानिपताच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला, असे म्हटले जाते. परंतु ते सर्वस्वी योग्य नाही. या युद्धात अहमदशाह अब्दालीचेही प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. दोन्ही बाजूंनी सव्वा लाख बांगडी फुटली, असे म्हटले जाते. पानिपतचा रणसंग्राम हा लाख, सव्वालाख सैनिकांच्या बलिदानाच्या स्मृतींचा इतिहास आहे. अब्दालीने भारतावर अनेकवेळा आक्रमण केले. परंतु नंतर पुन्हा आक्रमण करण्याची कोणाचीही हिंमत झाली नाही.’’ आंबेकर यांनीही या वेळी पानिपतच्या युद्धानंतर अवघ्या दहा वर्षांत १७६१ नंतर मराठ्यांनी परत दिल्ली कशी काबीज केली, याचे अभ्यासपूर्ण विवेचन केले. मानाजी पायगुडे सभेचे कार्याध्यक्ष अरुण पायगुडे यांनी प्रास्ताविक केले. तर विलास पायगुडे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Video : ''भारतात तुम्ही मला सुरक्षा देऊ शकत नाही का?'', राहुल गांधींची पोलिसांबरोबर बाचाबाची, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Mumbai Health Report: राज्यात पावसाळी आजारांचा कहर; मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद

ब्रिटिशांच्या १८८१ व करवीर संस्थानच्या १९०२ च्या गॅझेटिरमध्ये मराठा व कुणबी एकच, तरीही मराठा समाजाला झगडावं लागतय; कोल्हापुरात आंदोलन पेटणार

Indira Ekadashi 2025: पूर्वजांना मुक्त करण्यासाठी महिलांनी काय करू नये, जाणून घ्या नियम

Latest Marathi News Updates : परतीच्या पावसामुळे पाणीपातळीत वाढ, मुंबईतील धरणांत ९८.८२ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT