पुणे

राष्ट्र उभारणीसाठी एकत्र आले पाहिजे : डॉ. श्रीपाल सबनीस

CD

पुणे, ता. १० : ''''सध्याची परिस्थिती अशी आहे की, एकाच महापुरुषाला घेऊन आपल्याला जमणार नाही. सर्व महापुरुषांची बेरीज करून आपण एकत्र आले पाहिजे. जात, धर्म, पंथ, श्रीमंत-गरीब, वर्ण, वर्ग यांचा कसलाही विचार न करता राष्ट्रउभारणीसाठी एकत्र येणे आले पाहिजे,'''' असे मत ज्येष्ठ साहित्यिक आणि अखिल भारतीय साहित्य मराठी संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
''मातंग साहित्य परिषद'' व ''लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन'', सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित ''कृतज्ञता सन्मान पुरस्कार'' व ''साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे वाङ़्मय पुरस्कार'' वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी डॉ. सबनीस यांच्या हस्ते दलित स्वयंसेवक संघाचे माजी संघ प्रमुख व अण्णा भाऊ साठे स्मारक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब सोनवणे यांच्या ''शून्यातून शोषिताकडे'' या आत्मकथनाला जाहीर झालेला साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे राज्यस्तरीय वाङ़्मय पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. गजानन एकबोटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर यांनी भूषविले. सोनवने यांनी ''दे दान सुटे गिराण'', पोतराजकी, वाघ्या मुरळी या अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा बंद करण्यामध्ये मोठा वाटा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सांगोल्यात संतप्त मतदाराने EVM मशिन पेटवली

IPL 2024 : पावसामुळे बिघडणार प्लेऑफची शर्यत! SRH विरुद्ध LSG सामन्यापूर्वी हवामानाचे मोठे अपडेट

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सोलापूर-पेणमधील मतदारांचा मतदानावर बहिष्कार; पश्चिम बंगालमध्येही आंदोलन

"मी हत्या केलीच नाही," हत्येचे 8 गुन्हे असलेल्या महिलेने भर कोर्टात नाकारले आरोप; वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण

Arvind Kejriwal: केजरीवालांची प्रतीक्षा लांबली! सुप्रीम कोर्टानं सुनावणी पुढे ढकलल्यानं कोठडीत वाढ

SCROLL FOR NEXT