पुणे

व्यक्तिनिर्माणात शिक्षकांचा सिंहाचा वाटा मनीष कोल्हटकर; एनआयई आणि एमटेक इंजिनिअर्सच्या वतीने शिक्षकांचा सन्मान

CD

पुणे, ता. ४ : आयुष्यात भेटलेली प्रत्येक व्यक्ती लक्षात राहत नाही. पण आपले पहिली ते दहावीचे शिक्षक नेहमी लक्षात राहतात. कारण, आपल्या व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षकांचा सिंहाचा वाटा असतो, असे मत एमटेक इंजिनिअर्सचे व्यवस्थापकीय संचालक मनीष कोल्हटकर यांनी आज येथे व्यक्त केले.

सकाळ एनआयई व एमटेक इंजिनिअर्स यांच्या वतीने ‘शालेय शिक्षकांनी असा साधला संवाद’ या राज्यस्तरीय शिक्षकांसाठीच्या लेखन स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी ‘सकाळ’चे वृत्तसंपादक धनंजय बिजले, ‘सकाळ’ प्रशासनाचे वरिष्ठ व्यवस्थापक राम शेळके उपस्थित होते. कोल्हटकर म्हणाले, ‘‘एनआयईच्या माध्यमातून आजवर शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शिक्षकांचा माझ्यासह अनेक विद्यार्थ्यांच्या आजच्या यशात त्यांचा मोठा वाटा आहे.’’

राज्यभरातील ६५० पेक्षा अधिक शिक्षकांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता. जिल्हा परिषद, महापालिका, प्राथमिक व माध्यमिक शाळा या गटांनुसार शिक्षकांना स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले. एकूण ४७ शिक्षकांची यासाठी निवड करण्यात आली. सांगलीतील शौर्य पाटील या लहान मुलाने क्रांतिकारकांची कथा सांगत उपस्थितांची मने जिंकली. एनआयईचे सहव्यवस्थापक विशाल सराफ यांनी सूत्रसंचालन केले.

22689

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat Earthquake Today : पहाटे गुजरात हादरलं; कच्छ भागात भूकंपाचे धक्के, भूकंपशास्त्र विभागाची माहिती

PMP Route : ‘पीएमपी’चे मार्ग, फेऱ्या वाढणार; मार्गांची पुनर्रचना लवकरच

Maharashtra Weather Update : राज्यात थंडी कायम, तुमच्या जिल्ह्यात आज कसे असेल हवामान? जाणून घ्या

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! ई-केवायसीला मुदतवाढ, नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकाचवेळी खात्यात जमा होणार..

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! २० जानेवारीनंतर शेतकऱ्यांना मिळणार खरीप पीकविमा; उंबरठा उत्पादनाची माहिती केंद्राला सादर; शेतकऱ्यांना २१०० कोटी मिळण्याची आशा

SCROLL FOR NEXT