पुणे

सर्दी, खोकल्याकडे नको दुर्लक्ष

CD

पुणे, ता. ८ : सर्दी, खोकला आणि ताप अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. कारण, ‘एच ३-एन २’ या विषाणूंच्या संसर्गाची ही लक्षणे आहेत. यात घाबरून जाण्यासारखे निश्चित काही नाही. पण, योग्य निदान आणि अचूक उपचारासाठी ही लक्षणे दिसताच तातडीने वैद्यकीय सल्ला घ्या.
शहरात गेल्या काही दिवसांपासून सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढली आहे. चार-पाच दिवसांमध्ये ताप कमी होत असला तरीही दोन-तीन आठवडे सर्दी-खोकला कमी होत नाही. काही रुग्णांमध्ये तर दोन-दोन महिने खोकला राहिल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे. या मागे विषाणूंच्या इन्फ्लूएंझा कुटुंबातील ‘एच ३-एन २’ या विषाणूंचा संसर्ग कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

एन्फ्लुएंझाचा अर्थ?
पुण्यात २००८ मध्ये स्वाइन फ्ल्यूचा उद्रेक झाला होता. तो या कुटुंबातील ‘एच १-एन १’ हा विषाणू होता. तसेच, आता ‘एच ३- एन २’ या विषाणूंच्या संसर्गाचे रुग्ण आढळत आहेत. दोन महिन्यांपासून या रुग्णांची संख्या शहरात वाढत आहे.

सर्वाधिक काळजी कोणी घ्यावी?
कोणत्याही व्यक्तीला इन्फ्लूएंझा विषाणूंचा संसर्ग होण्याची शक्यता असते. मात्र, यात लवकर निदान आणि वेळेत उपचाराला महत्त्व असते. पण गर्भवती, ज्येष्ठ नागरिक, हृदयविकार, मधुमेह, उच्चरक्तदाब, मूत्रपिंडविकार अशा विविध सहव्याधी असलेले रुग्ण व लहान मुलांना सर्वाधिक धोका असतो. त्यामुळे या रुग्णांनी स्वतःची काळजी प्रकर्षाने घेतली पाहिजे, असा सल्लाही वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला.

ठळक लक्षणे
- कोरडा खोकला
- सर्दी
- डोकेदुखी
- अंगदुखी
- ताप

अशी घ्या काळजी
- गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे
- घराबाहेर पडताना मास्क आवर्जून वापरावा
- हस्तांदोलन टाळा
- नाकाला वारंवार स्पष्ट करू नका
- शिंकताना, खोकताना तोंडावर रुमाल ठेवा

संशोधन संस्था काय म्हणतात?
हा विषाणू एन्फ्लुएंझाच्या फ्ल्यू प्रकारातील आहे. संपूर्ण देशामध्ये या आजाराच्या रुग्णांची संख्या दोन महिन्यांमध्ये वाढली आहे. या विषाणूंचा हवेतून प्रसार होतो. लक्षणे दिसताच वैद्यकीय सल्ला घेतल्यास उपचारातील गुंतागुंत टाळणे शक्य आहे, असे भारतीय वैद्यक आणि संशोधन परिषदेने (आयसीएमआर) सांगितले.

पुण्यात ‘एच ३- एन २’च्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यात विशेषतः खोकला लवकर बरा होत नाही. आतापर्यंत दमा किंवा क्षयरोग असलेल्या रुग्णांचा खोकला दीर्घकाळ राहात असल्याचे दिसत होते. पण, या प्रकारच्या आजारात सध्या खोकला दोन-दोन महिने रुग्णांना येतो. वेगवेगळी औषधे देऊनही तो बरा होत नाही.
- डॉ. मुकुंद पेनुरकर,
वैद्यकीय तज्ज्ञ, संजीवन रुग्णालय

काही रुग्णांना या आजारामुळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागते. पण, त्यांची संख्या आजार झालेल्या रुग्णांच्या तुलनेत कमी आहे. मात्र, हा आजार होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सातत्याने करणे आवश्यक आहे. त्यासाठी फ्ल्यू प्रतिबंधात्मक लसीकरणही आहे. ही लस घेतली पाहिजे.
- डॉ. अमित सांबारे,
वैद्यकीय तज्ज्ञ, संजीवन रुग्णालय

सुरवातीला अंगदुखी होती. नंतर ताप आला, सर्दी-खोकला झाला. हे सगळं अवघ्या चार ते पाच दिवसांमध्ये झाले. ही सर्व लक्षणे ‘एच ३- एन २’ या विषाणूंच्या संसर्गाची असल्याचे सांगितले. त्यानुसार औषधोपचार सुरु केले. त्यामुळे आता ताप कमी झाला असला तरीही सर्दी-खोकला मात्र कायम आहे.
- शशांक भांडे, रुग्ण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT