पुणे, ता. १९ : सातबारा उताऱ्यावरील प्रलंबित वारसनोंदी, खरेदीच्या नोंदी, तक्रार नोंदी निकाली काढण्याच्या सूचना जमाबंदी आयुक्त निरंजन सुधांशू यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. गेल्या एक वर्षांपासून हरकत नसलेल्या व असलेल्या अशा सुमारे ८ हजार नोंदी राज्यात असून पुणे जिल्ह्यात ही संख्या सुमारे १ हजार एवढी आहे.
सातबारा उताऱ्याचे संगणकीकरण पूर्ण करून ई-फेरफार प्रणाली गेल्या दोन वर्षापासून जमाबंदी आयुक्त कार्यालयाने अमलात आणली आहे. या प्रणालीमध्ये कामकाजावर देखरेख ठेवण्याच्या दृष्टिने फेरफार, तसेच नोंदीची प्रलंबितता दिसण्यासाठी माहिती व्यवस्थापन प्रणाली (एमआयएस) ई-फेरफारच्या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रणालीमुळे राज्यात जिल्हानिहाय किती फेरफार प्रलंबित आहेत, याची माहिती उपलब्ध होते. त्यामध्ये मागील एक वर्षांपासून किती फेरफार प्रलंबित आहेत, याची माहिती समोर आली आहे. हरकत असलेल्या व नसलेल्या नोंदी शक्यतो एक वर्षाच्या आत निकाली काढणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर सातबारा उताऱ्यावर प्रलंबित असलेले फेरफार १०० टक्के निकाली काढून तसा अहवाल कार्यालयास सादर करण्याच्या सूचना जमाबंदी आयुक्तांनी दिल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.