पुणे

हरकती-सूचना देण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषद - लोगो

CD

पुणे, ता. २८ : फुरसुंगी, उरुळी देवाची या दोन गावांसाठी स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्याच्या निर्णयावर हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत ३० एप्रिल रोजी संपुष्टात येणार आहे. त्यास अवघ्या दोन दिवसांचा कालवधी राहिला आहे. दरम्यान आतापर्यंत या निर्णयावर १५०हून अधिक हरकती दाखल झाल्या आहेत.

फुरसुंगी, उरुळी देवाची ही दोन गावे सन २०१७ मध्ये पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आली. त्यानंतर येथे महापालिकेने आकारलेला कर जास्त असल्याने तसेच कोणत्याही सोयीसुविधा मिळत नसल्याने या गावांनी महापालिकेतून वगळण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ६ डिसेंबर २०२२ रोजी झालेल्या बैठकीत केली होती. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी ही गावे वगळण्याचे जाहीर केले. त्यानुसार पालिका प्रशासनाने प्रक्रिया सुरू करून शासनाकडे अहवाल पाठविला होता. नगरविकास विभागाचे उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर यांनी याबाबतची प्रारुप अधिसूचना ३१ मार्च रोजी प्रसिद्ध केली. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडे नागरिकांनी हरकती नोंदविण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, आतापर्यंत सुमारे १५० हरकती, सूचना प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. ३० एप्रिलपर्यंत नागरिकांना हरकती, सूचना दाखल करता येणार आहेत. प्राप्त हरकतींवर सुनावणी होऊन त्याचा अभिप्राय पुढील एका महिन्यात राज्य शासनाकडे पाठविला जाईल. त्यानंतर शासनस्तरावरून त्यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगरपालिका शाखेचे सहआयुक्त व्यंकटेश दुर्वास यांनी दिली. या प्रकियेनंतर फुरसुंगी, उरुळी देवाची नगरपरिषद स्थापन होण्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. या सर्व प्रक्रियेसाठी कमीतकमी दीड ते दोन महिने इतका अवधी लागण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT