Mansoon Mission esakal
पुणे

Mansoon Mission: 'अतिवृष्टी असो की उन्हाची लाट' आधीच मिळणार पूर्वसूचना ! पुण्यात बनलं मॉन्सून मिशन

CD

पुणे, ता. १८ : अचानक येऊन शहरांना झोडपून काढणारा पाऊस, ढगफुटी अशा वेगवेगळ्या दाणादाण उडविणाऱ्या नैसर्गिक आपत्तींची पूर्वसूचना देणारे भारतीय प्रारूप पुण्यात विकसित करण्यात आले आहे. ‘मॉन्सून मिशन’ अंतर्गत भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्थेने’ (आयआयटीएम) हे प्रारूप तयार केले आहे.


पुण्यात २५ सप्टेंबर २०१९ ला आंबिल ओढ्याला महाभयंकर पूर आला. ओढ्या काठच्या सोसायट्यांमधील पहिल्या मजल्यापर्यंत पाणी गेले. पार्किंगमधील वाहनांचे अतोनात नुकसान झाले. ओढ्याच्या पाण्याच्या प्रवाहात मोठ्या संख्येने वाहने वाहून गेली. ती काळरात्र आठवली तरीही पुणेकरांच्या अंगावर शहारे येतात. अशा नैसर्गिक आपत्तींची पूर्वसूचना देणारे प्रारूप आता पृथ्वी विज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या ‘आयआयटीएम’मधील शास्त्रज्ञांनी हे प्रारूप निर्माण केले आहे.

मॉन्सून मिशन

जागतिक पातळीवर हवामानाचा अंदाज वर्तविणारी विविध प्रारूप आहेत. आतापर्यंत भारतात त्याच आधारावर हवामान अंदाज वर्तविला जात होता. हवामान अंदाज देणारे प्रारूप देशात निर्माण करण्यासाठी गेल्या दहा वर्षांपूर्वी ‘मॉन्सून मिशन’ पुण्यात सुरु करण्यात आले. त्या अंतर्गत नैर्ऋत्य मोसमी पावसाचा (मॉन्सून) अंदाज व्यक्त व्यक्त करणारी प्रारूप तयार करण्यात आले. त्या आधारावर मध्यम आणि दीर्घकालीन पावसाचा अचूक अंदाज वर्तविण्यात येऊ लागले. त्या पुढे जाऊन आता शेतकरी, वीज उत्पादक कंपन्या, वाहतूक यांच्यासाठी अंदाज देण्याची व्यवस्था मॉन्सून मिशनच्या दुसऱ्या टप्प्यात विकसित करण्यात आली. आता तिसऱ्या टप्प्यात अचानक हवामानात बदल होऊन निर्माण होणाऱ्या नैसर्गिक आपत्तींची पूर्व सूचना देण्यावर भर देण्यात आहे, अशी माहिती ‘आयआयटीएम’मधील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सूर्यचंद्रा राव यांनी दिली.

काय आहे प्रारूप?
हवामानात होणारे बदल अचूक बदल टिपणारी यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. त्यासाठी अद्ययावत सेंसर्स वेगवेगळ्या भागांमध्ये बसविण्यात आले आहे. रडार यंत्रणा सक्रिय करण्यात आल्या आहेत. त्या आधारावर हवामानातील बदलांची माहिती सातत्याने संकलित केली जाते. या बदलांचे अत्यंत कमी वेळेत विश्लेषण करून त्याचा पुढील दोन ते चार तासांमध्ये नेमक्या कोणत्या भागात आणि कसा परिणाम होईल, याचा अंदाज वर्तविणारे प्रारूप ‘मॉन्सून मिशन’च्या तिसऱ्या टप्प्यात विकसित करण्यात येत आहे.

या प्रारूपाची गरज का आहे?
वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तींमध्ये देशभरात गेल्या वर्षी दोन हजार २२७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कोट्यवधी रुपयांचे नुकसान यातून झाले आहे. ही जीवित हानी टाळण्यासाठी नैसर्गिक आपत्तींची अचूक माहिती देणाऱ्या प्रारूपाची गरज आता निर्माण झाली आहे.

याचा देता येणार अंदाज
- उष्णतेची लाट
- थंडीची लाट
- ढगफुटी
- अतिवृष्टी
- हिमवादळ
- हिमवृष्टी
- चक्रीवादळ

देशात तीव्र नैसर्गिक घटना घडण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्याचा अंदाज वर्तविणारी यंत्रणा विकसित करण्याची प्रकर्षाने गरज निर्माण झाली आहे. या अंदाजाचा फायदा नागरिकांबरोबरच आपत्तीच्या व्यवस्थापनासाठी होईल. त्यातून होणारे प्राणहानी टाळली जाईल.
- डॉ. सूर्यचंद्रा राव, वरिष्ठ शास्त्रज्ञ, आयआयटीएम
.........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT