पुणे

पावसाने उघडीप दिल्याने टँकरच्या संख्येत पुन्हा वाढ

CD

पुणे, ता. ११ : पावसाने उघडीप दिल्याने ३२ टँकरऐवजी आता ३५ टँकरद्वारे जिल्ह्यात पाणीपुरवठा करावा लागत आहे. मागील आठवड्यापर्यंत ही संख्या ४४ होती. पावसाच्या आगमनानंतर टँकरची संख्या १२ ने कमी झाली होती. त्यामुळे ३२ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. त्यामध्ये आता नव्याने तीन टँकरची भर पडली आहे.

कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये ७८ हजार २०९ नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा बसत होत्या. जून महिना पूर्णता: कोरडा गेल्याने पाणी टंचाईच्या झळा ग्रामीण भागातून शहरवासीयांना बसण्यास सुरुवात झाली होती. मात्र, जुलै महिन्यात मान्सूनचे आगमन होत सुरुवातीचे आठ ते दहा दिवस पावसाची रिपरीप कायम राहिल्याने टंचाईच्या झळा कमी झाल्या. त्यातच ६ जुलैपासून जिल्हा प्रशासनाकडून ४४ टँकरपैकी १२ टँकर कमी करत ३२ टँकर सुरू ठेवण्यात आले. मात्र, ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी पावसाने उघडीप दिली असून काही ठिकाणी पावसाने तुरळक हजेरी लावली आहे. त्यामुळे पुन्हा टॅंकरच्या संख्येत तीनने वाढ करीत ३५ टँकर सुरू करण्यात आले आहे. पुरंदर तालुक्यात पाणी टंचाईच्या झळा कमी झाल्या म्हणून ६ टँकरपैकी ३ टँकर कमी करण्यात आले होते. मात्र, पावसाचा जोर ओसरल्याने पुन्हा ६ टँकर सुरू करण्यात आले आहे.

तालुका - टँकर - गावे
आंबेगाव - १२ - १७
जुन्नर - ०६ - ०७
खेड - ११ - १७
पुरंदर - ०६ - ०६
एकूण - ३५ - ४७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray visits Meenatai Thackeray statue : उद्धव ठाकरेंनी केली मीनाताईंच्या पुतळ्याची बारकाईने पाहणी अन् म्हणाले ‘’या मागे दोनच व्यक्ती…’’

World Athletics Championships : नीरज चोप्राने एकाच प्रयत्नात केले सर्वांना गार, आता पाकिस्तानच्या अर्शद नदीमच्या कामगिरीकडे लक्ष

Uddhav Nimse : मुंबई हायकोर्टाकडूनही जामीन नाकारला: उद्धव निमसे अखेर पोलिसांपुढे शरण

Navratra and Overthinking Tips: मन गोंधळले असेल तर नवरात्रीचे ९ दिवस देतील नवा आधार! अशी करू शकता ओव्हरथिंकिंगवर मात

Jalaj Sharma : जिल्हाधिकारी जलज शर्मांची मोठी घोषणा: नाशिकमधील गड-किल्ले होणार स्वच्छ

SCROLL FOR NEXT