पुणे

साळवे स्मारक समिती ट्रस्टची निवडणूक आयोगाकडे तक्रार

CD

पुणे, ता. १० : मातंग समाजाची मते भाजपला मिळावीत यासाठी क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे स्मारक समिती ट्रस्टने भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना पाठिंबा दिला असल्याचे खोटे सांगितले जात आहे. ट्रस्टने असा कोणताही पाठिंबा दिलेला नाही. याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे, असे ट्रस्टचे सचिव विकास लक्ष्मण सातारकर, उपाध्यक्ष रवी आरडे, खजिनदार अशोक जगताप यांनी स्पष्ट केले आहे.
भाजपला मातंग समाजाने पाठिंबा दिल्याचे पत्र भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी प्रकाशित केले आहे. हे खोटे आहे. लहूजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकासाठी २०२१-२२ मध्ये ठाकरे सरकारने ही जागा ताब्यात घेतली. या जागेवर राष्ट्रीय स्मारकाचे आरक्षण टाकून ८७.११ कोटी रुपये निधी मंजूर केला होता. 
क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे स्मारक समिती ट्रस्ट मातंग समाजातील सुमारे २५ सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन स्थापन केला असून सर्वपक्षीय समाज नेते यामध्ये पदाधिकारी आहेत. मुरलीधर मोहोळ यांना पाठिंबा देण्याबाबतचा कोणताही ठराव ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला नाही. याबाबत ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी सुहास दिवसे यांच्याकडे तक्रार नोंदविली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat Farmers Protest : गुजरातमध्ये शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण; ४७ जणांना अटक, १००० हून अधिक आंदोलकांविरुद्ध गुन्हे दाखल

Shravan 2025 Food Avoid: श्रावणात नॉन व्हेज टाळताय? मग प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी 'या' 5 शाकाहारी पदार्थांचा करा आहारात समावेश

Latest Maharashtra News Updates : आळंदीत रविवारी संत भेटीचा सोहळा, वारकरी संप्रदायाला अनुभवायला मिळणार दुग्धशर्करा योग

Mumbai Crime : मोबाईलवर गेम खेळताना पाहून संतापला पिता, चार वर्षांच्या चिमुकलीची गळा दाबून हत्या अन्...

Pune News : देशी गोवंश संवर्धन हे ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT