पुणे, ता. २० ः ‘‘भाजप पक्ष म्हणून आम्ही ‘दि बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी’च्या निवडणुकीत उतरलो नव्हतो. ही निवडणूक ‘बेस्ट’मध्ये काम करणाऱ्या कामगारांची होती. यामध्ये राजकारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी केले. त्याचे फळ त्यांना मिळाले आणि हातात भोपळा आला.’’ अशी टीका सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी बुधवारी केली.
गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याच्या अनुषंगाने पुण्यात आयोजित बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना शेलार बोलत होते. काही दिवसांनी होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून शशांक राव आणि प्रसाद लाड प्रमुख प्रचारक असतील, अशी घोषणा शेलार यांनी यावेळी केली. शेलार म्हणाले, ‘‘आज मुंबई तसेच मराठीचा विजय झाला आहे. तसेच हा विजय भाजपचा आहे. जे राजकीय विश्लेषक दोघे भाऊ एकत्र येतील यावरून आम्हाला सांगत होते, त्यांना मी एवढेच सांगतो की, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रमुख प्रचारक म्हणून शशांक राव आणि प्रसाद लाड यांचे नाव मी आज जाहीर करतो. या दोघांनीच या दोन्ही भावांच्या पक्षाला मुंबईकरांचा आशीर्वाद कोणाला आहे हे दाखवले आहे.’’
बैठकीविषयी शेलार म्हणाले, ‘‘यावर्षीचा गणेशोत्सवात थेट प्रक्षेपणाद्वारे दर्शन तसेच चौकांमध्ये विद्युत रोषणाई, मंडळांना बक्षीस देखील जाहीर करण्यात आले आहेत. विविध महोत्सव देखील याकाळात होणार आहेत. तसेच गणेशोत्सवात सात दिवस रात्री बारापर्यंत ध्वनिक्षेपकांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच विसर्जनाच्या संदर्भात मंडळाशी योग्य चर्चा करून निर्णय घेतला जाईल.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.