पुणे

विचारधारांच्या लढाईचे शस्त्राच्या लढाईत रुंपातर सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांची खंत

CD

पुणे, ता. १७ ः ‘‘खऱ्या अर्थाने भारतात लोकशाही अजून नांदायला सुरवात झाली नाही. दोन पक्ष एकमेकांना संपवण्यासाठी एकमेकांवर तुटून पडतात. एकमेकांना नष्ट करून, खून करून राज्य मिळवायचे, अशा प्रकारची विचारधारा आहे. विचारधारांची लढाई ही हातघाईची, शस्त्रांची लढाई झाली आहे,’’ असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केले.
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्यावतीने ‘भगवान बिरसा मुंडा एक प्रेरणादायी संघर्ष गाथा’ या विषयावर प्रभुणे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. सुधाकर जाधवर उपस्थित होते.
प्रभुणे म्हणाले, ‘‘लोकशाहीमध्ये क्षणाक्षणाला साम्राज्यवाद दिसून येतो. बिरसा मुंडा हे देशासाठी सर्वस्व अर्पण करणारे देशभक्त होते. देशात खऱ्या अर्थाने लोकशाही यावी, लोकांचे राज्य यावे, आदिवासींना अन्न मिळावे, जमीन मिळावी, अधिकार मिळावेत यासाठी झटणारे ते युवक होते. त्यांच्या आंदोलनामुळे जनजाती जागृत झाल्या आणि त्यांना आज विशेष अधिकार मिळाले.’’
फोटो ः 40683

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarfaraz Khan Century: कसोटी संघातून वगळले, त्या सर्फराजने खणखणीत शतक झळकावून निवड समितीला उत्तर दिले

Nashik Water Supply : इंदिरानगरची पाण्याची समस्या सुटणार; जलवाहिनी टाकण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाची परवानगी

मराठी लोकांचा वरण भात म्हणजे गरीब शेतकऱ्यांचं जेवण... विवेक अग्निहोत्रीच्या वक्तव्यावर भडकले नेटकरी; म्हणतात- या गाढवाला...

Stock Market Closing: सेन्सेक्स 676 अंकांच्या वाढीसह बंद; ऑटो, रिअल्टी आणि मेटल क्षेत्रात जोरदार खरेदी

Nashik Air Pollution : नाशिकमध्ये वाहनांचा धूर जीवघेणा; प्रदूषण नियंत्रण विभागाचे दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT