पुणे

कचरा व्यवस्थापनासाठी इंदूर पॅटर्नचा वापर जिल्हा प्रशासनाचा निर्णय : पहिल्या टप्प्यात बारामती, लोणावळ्याची निवड

CD

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २९ ः जिल्ह्यातील १४ नगर परिषदा व चार नगरपंचायतींमध्ये इंदूर शहराच्या धर्तीवर घनकचरा व्यवस्थापन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात बारामती आणि लोणावळा नगर परिषदांची त्यासाठी निवड करण्यात आली असून, तेथे पथदर्शी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
या दोन्ही शहरांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करून तांत्रिक मान्यतेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सादर करण्यात आला आहे, अशी माहिती नगर परिषद प्रशासनाचे उपायुक्त व्यंकटेश दुर्वास यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘चाकण शहर व आसपासच्या ग्रामपंचायत हद्दीतील घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी क्लस्टर स्थापन करून शहरी भाग व ग्रामीण भाग असा समूह घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित आहे.’’
जिल्हा प्रशासनाकडून जागतिक स्तरावरील पुणे ग्रँड सायकल टूर पुढील वर्षी घेण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने जिल्ह्यातदेखील स्वच्छतेला महत्त्व दिले जाणार आहे. त्याचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायतीमधील कचरा समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी इंदूर शहराच्या धर्तीवर घनकचरा व्यवस्थापन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी बारामती, लोणावळा आणि चाकणसारख्या शहरांना पहिल्या टप्प्यात प्राधान्य देण्यात आले आहे. कचऱ्याचे व्यवस्थापन करताना शहरात निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याचे १०० टक्के संकलन करणे, ओला व सुका कचरा जागेवरच विलग करणे, अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या साह्याने शहरातील रस्त्यांची स्वच्छता करणे याचा समावेश आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा व नगरपरिषद स्तरावरून कुशल मनुष्यबळाच्या साहाय्याने व डिजिटल माध्यमातून प्रभावी नियंत्रण करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.
बारामती नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनासाठीचा एकूण ५५ कोटी रकमेचा व लोणावळा नगरपरिषदेचा ३३ कोटी रकमेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची मान्यता मिळाल्यानंतर बारामती शहराच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत ५० टन क्षमतेचा बायो सीएनजी प्रकल्प, सुक्या कचऱ्याचे विलगीकरण करून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी ५० टन क्षमतेचा प्रकल्प उभारणे, शहरातील रस्ते चार ते पाच अत्याधुनिक यांत्रिक वाहनांच्या साहाय्याने साफ करणे आदी कामांचा समावेश त्यामध्ये असणार आहे.
लोणावळा शहरात ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी २० टन क्षमतेचा बायो सीएनजी प्रकल्प, उद्यान कचऱ्यासाठी १० टन क्षमतेचा प्रकल्प तसेच हरित कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी अत्याधुनिक वाहन व मशिनरीचा वापर करण्यात येणार आहे. यातून लोणावळा व खंडाळा ही जुळी शहरे राज्यातील आदर्श हिल स्टेशन उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
चाकण शहर व आसपासच्या ग्रामपंचायत हद्दीतील घनकचऱ्याचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी शहरी व ग्रामीण भाग असा समूह घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित आहे. चाकण समूहांतर्गत चाकण नगरपरिषद, राजगुरुनगर नगरपरिषद व आसपासच्या १० ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला आहे. यात १०० ते १२५ टन क्षमतेचा बायो सीएनजी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यासाठी ‘एमआयडीसी’तील सहा एकर जागेची निवड करण्यात आलेली असून, ग्रामपंचायत हद्दीमध्ये अजून पर्यायी सरकारी जागा असल्यास ती प्रकल्पासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी ५५ ते ६० कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक अपेक्षित आहे. शहरी व ग्रामीण भागासाठी असलेल्या विविध योजनांमधून यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.
--------
‘‘जिल्ह्यातील या महत्त्वाच्या शहरांमध्ये स्वच्छतेसाठी इंदूरच्या धर्तीवर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. त्यासाठीची प्रक्रिया सुरू केली असून, पुढील वर्षापासून त्याची अंमलबजावणी सुरू होऊन त्यानंतरच्या तीन वर्षांत दृष्य परिणाम दिसू लागतील
- जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Powai Kidnapper Encounter: पवई प्रकरणातील किडनॅपरचा एन्काऊंटर! छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागली अन्..

Delhi Riots 2020 Update : ‘’अचानक नव्हता उफळला दिल्लीत हिंसाचार, सत्ता बदलण्यासाठीचा तो होता कट’’ ;पोलिसांचा दावा!

Rohit Arya News: नाराजी सरकारवर; पण माथेफिरूचा मुलांच्या जीवाशी खेळ, पडद्यामागची फिल्मी गोष्ट आली समोर

Sepsis Explained: ‘शिर्डी के साईबाबा’ फेम सुधीर दळवी जीवघेण्या सेप्सिसमुळे गंभीर; वाचा संपूर्ण माहिती एकाच क्लिकवर

Latest Marathi News Live Update : वादळामुळे गुजरातच्या बोटींनी भाईंदरच्या उत्तन किनाऱ्यावर घेतला आश्रय

SCROLL FOR NEXT