पुणे, ता. ४ : कोणत्याही बँकांनी ३० जून २०२६ पर्यंत शेतकऱ्यांकडे कर्ज वसुलीसाठी तगादा लावू नये, तसेच कर्जमाफीसंदर्भात सरकारने घेतलेल्या निर्णयावरून शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी राज्यात शेतकरी संवाद यात्रा काढण्यात येणार आहे.
माजी आमदार बच्चू कडू, माजी मंत्री महादेव जानकर यांच्या उपस्थितीत पुण्यातून गुरुवारी (ता. ६) संवाद यात्रेस सुरुवात होणार आहे, अशी माहिती शेतकरी हक्क समितीचे सदस्य विठ्ठल पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शेतकऱ्यांचा संघर्ष हा केवळ कर्जमाफीचा नाही तर न्याय आणि सन्मानाचा लढा आहे. राज्यातील शेतकऱ्यांना २० जून २०२६ पर्यंत कोणतेही कर्ज अथवा हप्ता भरावा लागणार नाही. चालू हंगामात सर्व राष्ट्रीयीकृत, जिल्हा मध्यवर्ती व सहकारी बँकांना शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. कोणतेही अधिकारी, बँक व्यवस्थापक, पतसंस्था, खासगी कर्ज संस्था यांनी शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल. मात्र, सरकारच्या निर्णयानंतर शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे संवाद यात्रा काढणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.