पुणे, ता. १० : ‘‘ज्योतिषशास्त्र हे केवळ भविष्यातील अंदाज सांगणारे नाही, तर जीवनातील समस्यांचे आकलन करून दुःख दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारे शास्त्र आहे,’’ असे मत अतुलशास्त्री भगरे यांनी व्यक्त केले.
‘गौरीकैलास ज्योतिष संस्थे’तर्फे ‘वार्षिक ज्योतिष महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. यावेळी अनिल चांदवडकर, पं. विजय जकातदार, पं. नंदकुमार जोशी, रमेश पलंगे, पं. दिलीप अवस्थी, पुष्पलता शेवाळे, डॉ. जयश्री बेलसरे, जानकी पाचर्णे, रोहित वर्मा, शुभांगिनी पांगारकर आदी उपस्थित होते. दरम्यान, दीर्घकालीन ज्योतिष संशोधन कार्यासाठी डॉ. चंद्रकांत शेवाळे यांना ‘कै. मनोहर केंजळे स्मृती पुरस्कार-२०२५’ प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या समारोप सत्रात आदिनाथ साळवी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले; तर उपस्थितांना ‘फलादेशाचे तंत्र’ हे पुस्तक स्मृतिचिन्ह म्हणून देण्यात आले. गौरी आणि कैलास केंजळे यांनी स्वागत केले, तर अपर्णा गोरेगावकर यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.