पुणे. ता. ८ : ‘‘काँग्रेसचे खासदार राहुल गांधी अलीकडच्या काळात सलीम जावेद यांच्याशी संपर्क साधून, त्यांच्याकडून स्क्रिप्ट लिहून घेत आहेत. ही स्क्रिप्ट अतिशय मनोरंजनात्मक आहे. त्यातून मनोरंजनापलीकडे काहीच होत नाही. सगळ्या गोष्टी ते कपोलकल्पित मांडत आहेत,’’ अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी टीका केली.
राहुल गांधी यांनी मतांची चोरी होत असल्याचा आरोप करीत निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पुण्यात विविध कार्यक्रमासाठी दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी गांधी यांनी केलेल्या आरोपाबाबत विचारले असता, फडणवीस यांनी ही टीका केली. ते म्हणाले, ‘‘राहुल गांधी एकीकडे म्हणत आहे की मतदार यादीमध्ये त्रुटी आहेत. आम्ही देखील एवढ्या वर्षांपासून ते सांगत आहोत. ते केवळ आपल्या हरण्याचे काही तरी कारण शोधत आहेत.’’
इंडिया आघाडीच्या बैठकीत शेवटच्या रांगेत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना बसविण्यात आले. त्यावर विचारले असता, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,‘‘ आमच्याकडे तर ते नेहमी पहिल्या रांगेत राहिले. तिथं त्यांचं काय मान सन्मान आहे, हे आता आपल्या लक्षात आला आहे.’’
पुणे शहरात विसर्जन मिरवणुकीवरून गणेशोत्सव मंडळांमध्ये सुरू असलेल्या वादावर फडणवीस म्हणाले, ‘‘ पुणे म्हटल्यानंतर चर्चा, वाद, विवाद होतातच पण काळजी करू नका, हेमंत रासने आणि मुरलीधर मोहोळ बैठक घेणार आहेत. सर्व मिळून एक निर्णय घेतील. दरवर्षी काही ना काही वाद होतात. विनाकारण सरकार हस्तक्षेप करणार नाही. काही मार्ग नाही निघाला तरच लक्ष घालू.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.