पुणे

प्राणिजन्य पदार्थांसाठी निर्यातीच्या दिशेने पाऊल राज्यातील जनावरांमध्ये लसीकरणामुळे लाळ खुरकूतचे प्रमाण कमी

CD

पुणे, ता. २१ ः राज्यातून लाळ खुरकूत हद्दपार करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून सहा महिन्यांनी लसीकरण करण्यात येते. त्यामुळे राज्यात साथ स्वरूपात लाळ खुरकूत आढळत नसल्याचे निष्पन्न झाले आहे. लाळ खुरकूत मुक्त राज्य घोषित करण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल असून, महाराष्ट्रासह सहा राज्यामध्ये एकाच वेळी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यामुळे अरब देशांबरोबरच आता इतर देशांमध्ये प्राणीजन्य पदार्थांसाठी बाजारपेठ खुली होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडत आहे.
महाराष्ट्रामध्ये ऑगस्टमध्ये लाळ खुरकूत प्रतिबंधात्मक लसीकरणाची सातवी फेरी सुरू झाली आहे. केंद्र शासनाकडून प्रत्येक सहा महिन्याला लसीकरणाचा पुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्राला साधारण दीड ते पावणे दोन कोटी लशींचे डोस मिळतात. मागील वर्षभरापासून लाळ खुरकूतची साथ मोठ्या प्रमाणात फैलावली नसली तरी काही गोठ्यांवर जनावरांना रोगाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र, त्याचा फैलाव पूर्ण गावामध्ये झाल्याचे आढळले नाही, असे पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून सांगण्यात आले. हा रोग विषाणूजन्य असून गाय, बैल, म्हैस आदी पशूंसाठी घातक ठरतो. जनावरांना ताप येणे, तोंडाला फोड येऊन जखमा होणे, खुरांना जखमा होणे अशी त्याची लक्षणे आहेत. त्यामुळे जनावरे काही खाऊ शकत नसल्याने प्रतिकारशक्ती कमी होऊन पशुधन दगावते. हा रोग प्रामुख्याने सांसर्गिक पाणी व खाद्य खाल्ल्याने होतो.


सहा राज्यांमध्ये उपक्रम सुरू
लाळ खुरकूतची संख्या शून्यावर आणण्यासाठी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राबरोबर पंजाब, हरियाणा, तमिळनाडू, कर्नाटक, मध्य प्रदेशमध्ये प्रायोगिक तत्त्वावर लाळ खुरकूत मुक्तचा उपक्रम सुरू आहे. त्यानुसार प्रत्येक सहा महिन्याला लसीकरण सुरू आहे. युरोपियन देशांमध्ये दूध, मांस, चामडे निर्यात करण्यासाठी नियमावली कडक आहे. त्यांचे निकष पूर्ण करण्यासाठी लाळ खुरकूत हद्दपार होणे महत्त्वाचे ठरणार आहे.

गाळप हंगामामध्ये जनावरांचे स्थलांतर...
साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी कारखान्यांच्या परिसरातील गावांमध्ये प्रामुख्याने लसीकरण मोहीम राबविण्यात येते. त्याचबरोबर जिल्ह्यातील प्रमुख जनावरांचा बाजार असलेल्या परिसरातील गावांमधील जनावरांचे अगोदर लसीकरण करण्यात येते. दुभत्या जनावरांना या रोगाचा फटका बसतोच परंतु, बैलांना या रोगाची लागण झाल्यानंतर त्यांची काम करण्याची क्षमता देखील क्षीण होते. परिणामी शेतकऱ्यांना याचा फटका बसतो.


दुधावर होतो परिणाम...
लाळ खुरकूत रोगाची लागण झाल्याने जनावरांचे खाणे-पिणे बंद होते. जनावरांना ताप येतो. शेतकऱ्यांचा जोडधंदा म्हणून पशुपालनाकडे कल आहे. अनेकांची रोजीरोटी ही दुधाळ जनावरांवर आहे. त्यांना रोगाची लागण दुधाळ जनावरांत दूध उत्पादनात घट येते. काही वेळेस दूध उत्पादन क्षमता कायमची नष्ट होण्याची शक्यता असते.


‘‘लाळ खुरकूत मुक्तची घोषणा झाल्यानंतर प्राणीजन्य पदार्थांना निर्यातीसाठी मोठी बाजारपेठ खुली होईल. राज्यातील जनावरांमध्ये लाळ खुरकूतची लागण झाल्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. सध्या राज्यात लसीकरण मोहीम सुरू आहे. आम्हाला अपेक्षा आहे, लवकरच महाराष्ट्र हा लाळ खुरकूत म्हणून घोषित होईल.
- डॉ. प्रवीणकुमार देवरे, आयुक्त, पशुसंवर्धन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांवर काही ठिकाणी वाहतूक मंदावली, नागरिकांची तारांबळ

हॅप्पी दिवाळी! दिपिका-रणवीरने लेक 'दुआ'सोबत पहिल्यांदाच शेअर केला फोटो....

शेवटच्या ओव्हरमध्ये ४ धावा अन् सामना टाय... BAN vs WI सामन्यात ड्रामा; थरारक सुपर ओव्हरमध्ये लागला निकाल

Deglur ZP Elections : ग्रामीण भागात मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीची धामधूम; शेतकऱ्यांच्या प्रश्नांना बगल

PESA Candidates Disqualification : पेसा भरतीतील २३ उमेदवारांचे भवितव्य धोक्यात; दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कागदपत्रांची पूर्तता कशी करणार?

SCROLL FOR NEXT