पुणे, ता. ६ : शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून लाइट रेल ट्रॅव्हल (एलआरटी ट्रॅम) हा अधिक परिणामकारक पर्याय ठरू शकतो, मेट्रोसारखेच वातानुकूलित डबे, कमी खर्च आणि बीआरटी मार्गाचा पुनर्वापर ही ‘एलआरटी’ची वैशिष्ट्ये असल्याने रस्त्यावरील खासगी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकते, असे मत ग्रीन थंब संस्थेचे अध्यक्ष ले. कर्नल सुरेश पाटील (निवृत्त) यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
पाटील म्हणाले, ‘‘शहरात प्रस्तावित खडकवासला-फुरसुंगी पाणी बोगदा प्रकल्पालाही ग्रीन थंबने विरोध दर्शवला आहे. हजारो कोटी रुपयांचा खर्च करणाऱ्या या प्रकल्पाऐवजी केवळ एक टक्के निधी गाळ काढणीसाठी वापरला, तर तीन ते चार टीएमसीने पाणी वाढू शकते, यासाठी ग्रीन थंबने २० वर्षांपासून कमी खर्चात गाळ काढून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यास हातभार लावला आहे, ’’ असा दावा त्यांनी केला, तसेच कालवा बंद करण्याच्या निर्णयालाही पाटील यांनी विरोध दर्शवत दोन्ही काठांवर दुचाकी आणि सायकलींना मार्ग मोकळा केल्यास ५० टक्के वाहतूक कमी होऊ शकते, असे मत व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.