पुणे

भाजप विनाश हा विकास म्हणून दाखवतो आदित्य ठाकरे यांची टीका ः भ्रष्टाचारी व्यक्तींना भाजपमध्ये अभय

CD

पुणे, ता. २० ः ‘‘पुण्याची अवस्था वाईट होत आहे. थोडा पाऊस झाला की पाणी तुंबते. प्रशासकीय जे काम झाले पाहिजे ते होताना दिसत नाही. दुसऱ्याने केलेल्या कामांची नावे भाजपकडून बदलली जातात आणि फीत कापतात. धार्मिक तेढ निर्माण करतात. दोन समाजामध्ये आणि भाषांमध्ये वाद निर्माण करणे, यावर ते निवडणूक लढवतात. स्वतःची विकासकामे दाखवू शकत नाहीत. भाजपची सत्ता ज्या शहरात किंवा राज्यात येते, त्याच्या उलट दिशेने प्रवास सुरू होतो. भाजप पक्ष हा पर्यावरणाकडे दुर्लक्ष करून विनाश हा विकास म्हणून दाखवतो,’’ अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शनिवारी केली.
पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर, शहरप्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे, वसंत मोरे उपस्थित होते. पक्षातून अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावर ठाकरे म्हणाले, ‘‘जी लोक भ्रष्टाचार करतात, त्यांना काही लपविण्यासारखी परिस्थिती आहे. ज्यांना तुरुंगाची भीती वाटते, ते भाजपमध्ये प्रवेश करतात. दुसऱ्या पक्षातील भ्रष्टाचारी घेऊन ते पक्ष स्वच्छ करत आहेत. भाजपने स्वतःची वॉशिंग मशिन खराब केली आहे.’’ तसेच ‘मनरेगा’मधून महात्मा गांधी यांचे नाव काढले, सरकारला त्यांच्या नावाची भीती का वाटते? असा प्रश्नही ठाकरे यांनी उपस्थित केला.

ठाकरे म्हणाले, ‘‘जगातील मुळा-मुठा नदीचे एकमेव उदाहरण असेल, ज्यामध्ये नदीचे पात्र खोल करण्याऐवजी कमी करत चालले आहेत. रुंदीकरणाऐवजी नदी अरुंद करत चालले आहेत. काही दिवसांनी या नदीवर रस्तादेखील करतील. त्याचबरोबर ज्यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, त्यावेळी धोक्याची घंटा ही केवळ शहरासाठी नसून राज्यासाठी आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष पण सर्व भ्रष्ट व्यक्ती ते पक्षात घेऊन स्वतःला पारदर्शक म्हणतो. मात्र, प्रत्यक्षात एकाच पक्षावर कारवाई होते आणि इतर पक्षावर कारवाई होत नाही.’’

आहेर म्हणाले, ‘‘पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. मुंबईसारखी लोकसंख्या याठिकाणी होत आहे. याप्रसंगी शहराचा सुयोग्य विकास होणे गरजेचे आहे. शिवसेना मुंबईप्रमाणे पुण्याचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील असेल.’’

निवडणूक आयोग आहे की नाही?
‘‘राज्यातील नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका पाहिल्या की प्रश्न पडतो, निवडणूक आयोग आहे की नाही? राज्याचे राजकारण प्रदूषित केले, घाणेरडे केले. नाशिक दत्तक घेऊ म्हणून मुख्यमंत्री सांगत होते, मात्र आता तपोवन बघत आहात, तिथे दडपशाही केली जाते. इतिहासात एवढ्या खालच्या पातळीवर राजकारण गेले नव्हते. त्याचे उत्तर मतदार महापालिकेच्या निवडणुकीत देतील.’’ असेही ठाकरे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Picnic Bus accident : भीषण अपघात! विद्यार्थ्यांना सहलीवरून परत आणणारी बस जम्मूत उलटली

Ishan Kishan: पुण्याच्या मैदानात सिलेक्टरला बॅट दाखवली, वर्ल्डकपच्या संघात एन्ट्री घेतली; ईशान किशनच्या स्वप्नवत पुनरागमनाची गोष्ट

Nora Fatehi Accident: अभिनेत्री नोरा फतेहीचा अपघात, डोक्याला दुखापत; मद्यधुंद कार चालकाने दिली धडक!

Palghar News : पालघरमध्ये पाच वर्षीय मुलीवर अत्याचाराचा धक्कादायक प्रकार; बालसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

Velhe Accident : तीव्र उतारावर नियंत्रण सुटले अन् टेम्पो पलटी; पाबे घाटात भीषण अपघात; १३ मजुर जखमी!

SCROLL FOR NEXT