पुणे, ता. २३ ः ‘‘पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू बालकांना देशाचे भविष्य समजून, ‘आजची मुले उद्याचा भारत’ असे म्हणत असत. मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि विचारस्वातंत्र्य हे राष्ट्र उभारणीचे मूळ समजत आणि म्हणूनच समस्त ‘विविध जाती, धर्मीय समस्त बालकांप्रती आत्मीयतेने वागणारे पं. नेहरूंचे व्यक्तिमत्त्व मानवतेचा साक्षात्कार देणारे होते,’’ असे मत काँग्रेस नेते गोपाळ तिवारी यांनी केले.
राजीव फाउंडेशन व लोहगाव येथील जे. के. अबॅकस कोचिंग क्लासेस यांच्या वतीने महात्मा गांधी व पं. नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आयोजित लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा व अबॅकसमधील आंतरराष्ट्रीय पातळीवरील विजेत्या मुलांचे पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव अन्वर राजन म्हणाले की, जनतेने देशाचे भवितव्य डोळ्यांसमोर ठेवून सरकार व लोकप्रतिनिधी निवडण्याचा हक्क नागरिकांनी कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता घेणे हीच खऱ्या लोकशाहीची गरज आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.