पुणे, ता. ११ : ‘वंदे मातरम’, ‘भारत माता की जय’, ‘आणीबाणी रद्द करा’ अशा घोषणा देत सर परशुरामभाऊ महाविद्यालयातील १६ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या आवारात आणीबाणीविरोधात सत्याग्रह केला होता. या सत्याग्रहाला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त महाविद्यालयाच्या आवारात एकत्र येऊन, तेव्हा केलेल्या आंदोलनाच्या आठवणी जागवल्या. आणीबाणीच्या आठवणी जागविण्यासाठी आलेल्या या साऱ्या माजी विद्यार्थी- विद्यार्थिनींचे स्वागत प्राचार्य डॉ. अविनाश मोहरील आणि उपप्राचार्य डॉ. विद्या अवचट यांनी केले. श्रीधर मधूकर उर्फ राजा दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी स. प. महाविद्यालयात शिकत असणाऱ्या कला व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसह बाहेरच्या महाविद्यालयातील विद्यार्थी- विद्यार्थिनींनीही त्यात सहभाग घेतला होता. त्यामध्ये अरविंद शिराळकर, चंद्रशेखर हिरेमठ, विवेक सबनीस, मोरेश्वर मांडके, श्रीकांत केळकर, अनिल पेंडसे, आनंद केळकर, विश्वास जोशी, प्रदीप भट, मिलिंद कसबेकर आणि मुकेश कसबेकर यांच्यासह भारती कुलकर्णी-ठुसे आणि सुनीता पुराणिक-गोडबोले या विद्यार्थिनींचाही सहभाग होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.