पुणे, ता. १६ ः मॉन्सून दाखल झाल्यापासून मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे जुलै महिन्यातच पुण्यातील चार धरणे ही शंभर टक्के भरली आहेत; तर खडकवासला प्रकल्पामध्ये ७७.२८ टक्के असा समाधानकारक पाणीसाठा झाला आहे.
खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे मिळून सध्या २२.५३ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा आहे. जो गेल्यावर्षी याच दिवशी केवळ ११.२८ टीएमसी पाणीसाठा होता. म्हणजेच जवळपास गतवर्षीपेक्षा दुपटीने पाणीसाठा जास्त आहे. टेमघर धरण ७१.६२ टक्के, वरसगाव ८१.६० टक्के, पानशेत ७६.५८ टक्के आणि खडकवासला धरण ६३.६० टक्के भरली आहेत, तर विसापूर, कळमोडी, आंद्रा आणि नाझरे धरण पूर्ण क्षमतेने म्हणजेच शंभर टक्के भरले आहेत. पुण्यामध्ये मे महिन्यापासूनच सुरू झालेला पाऊस जुलैपर्यंत कायम होता. जुलै महिन्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली पहिल्या आठवड्यामध्ये घाटमाथ्यावर पावसाने जोरदार हजेरी लावली होती. परिणामी, धरणसाठ्यात मोठी वाढ झाली; तर पुण्यातील विविध धरणांमधून झालेल्या पाण्याच्या विसर्गामुळे आणि मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे उजनी धरणात जुलैच्या महिन्यातच ९३.२२ टक्के पाणीसाठा झाला आहे.
धरणाचे नाव -- पाणीसाठा (टीएमसी) -- टक्के
खडकवासला -- १.२६ -- ६३.६०
टेमघर -- २.६६ -- ७१.६२
वरसगाव -- १०.४६ -- ८१.६०
पानशेत -- ८.१६ -- ७६.५८
एकूण -- २२.५३ -- ७७.२८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.