पुणे

कामगार विमा योजनेचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचवा

CD

पुणे, ता. २३ : ‘‘राज्य कामगार विमा योजना ही केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने राबविली जात आहे. या योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या विविध सुविधा उत्तम प्रकारच्या असून यांचा लाभ तळागाळातील गरजू कामगारांपर्यंत पोहोचवा’’, असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राज्य कामगार विमा महामंडळाच्या कामकाजाबाबत आढावा बैठकीत ते आबिटकर बोलत होते. या वेळी राज्य कामगार विमा सोसायटीचे आयुक्त रमेश चव्हाण, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, राज्य कामगार विमा महामंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी सुकांतचंद्र दास, कामगार विमा सोसायटीचे वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉ. बाळकृष्ण रंगदळ, बिबवेवाडी येथील विमा महामंडळाच्या रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अभिमन्यू पांडा आदी उपस्थित होते.
आबिटकर म्हणाले, ‘‘या योजनेत कामगारांची नोंदणी वाढविण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, तळेगाव, रांजणगाव, चाकण व कामगार असोसिएशनचे सहकार्य घ्यावे. एमआयडीसीमधील विविध कंपन्या तसेच इतर आस्थापनांनी कामगारांच्या विमा नोंदणीसाठी शिबीराचे आयोजन करावे व या माध्यमातून जास्तीत जास्त कामगारांना या योजनेत सहभागी करून घ्यावे.’’
जिल्हाधिकारी डूडी यांनी बिबवेवाडीतील कामगार रुग्णालयाच्या कामाबद्दल माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhanagari Dam : राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडले, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Shashikant Shinde : सध्याचे सरकार हे राज्याची तिजोरी रिकामी करून आलेले सरकार; महापालिका निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे दिले आदेश

Narayangaon Crime : लूटमार करणाऱ्या तीन गावगुंडांवर गुन्हा दाखल; दोन आरोपींना अटक

Indapur News : क्रिकेट खेळताना 32 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

Maharashtra Rain: २६ जुलैची बदलापूरकरांना पुन्हा भरली धडकी! नदीने गाठली पातळी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

SCROLL FOR NEXT