पुणे

‘एमपीएससी’ची ‘ई-केवायसी’ प्रक्रिया सुरू उमेदवारांना ओळख पडताळणी बंधनकारक, विद्यार्थ्यांकडून स्वागत - उमेदवारांना ओळख पडताळणी बंधनकारक

CD

पुणे, ता. २६ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) स्पर्धा परीक्षेतील अर्ज प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी महत्त्वाची ठरणारी ‘ई-केवायसी’ प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. आयोगाने यासंदर्भातील सुधारित परिपत्रक प्रसिद्ध करत २५ जुलै २०२५ पासून ही प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे आता कोणत्याही भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी आपली ओळख पडताळणी पूर्ण करणे अनिवार्य असणार आहे. अन्यथा, उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
आयोगाने या संदर्भात प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार, अर्ज स्वीकारण्यासाठी ‘ई-केवायसी’ प्रक्रिया पूर्ण केलेली असणे बंधनकारक आहे. ही केवायसी प्रक्रिया एकदाच पूर्ण करावी लागणार असून, उमेदवाराचे एकच प्रोफाइल सक्रिय राहील तर अन्य खाती निष्क्रिय मानली जातील. त्यामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसेल आणि पात्र उमेदवारांना योग्य संधी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. अनेक विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकांनी आयोगाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
या नवीन नियमानुसार, प्रत्येक उमेदवाराला आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर ‘वन टाइम रजिस्ट्रेशन’ (ओटीआर) करून आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि इतर ओळखपत्रांच्या आधारे केवायसी करावी लागणार आहे. केवायसी करण्यासाठी वापरला जाणारा मोबाईल क्रमांक हा आधार क्रमांकाशी जोडलेला असणे आवश्यक आहे, अन्यथा ‘ओटीपी’ न मिळाल्यास ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकणार नाही, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे. उमेदवारांनी वेळेवर ही प्रक्रिया पूर्ण करून परीक्षेच्या तयारीमध्ये कोणताही अडथळा येणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन आयोगाने केले आहे.
---------------------
ई-केवायसी कशी कराल?
- आयोगाच्या संकेतस्थळाला भेट द्या.
- वन टाइम रजिस्ट्रेशन (ओटीआर) पूर्ण करा.
- प्रोफाइलमध्ये किंवा अर्ज करण्याच्या टप्प्यावर ई-केवायसी पर्यायावर क्लिक करा.
- आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि इतर आवश्यक ओळखपत्रांची माहिती भरा.
- मोबाईल नंबरची पडताळणी करा.
- दिलेल्या सूचनांनुसार ऑनलाइन किंवा ऑफलाइन पर्याय निवडून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा.
----------------
पारदर्शकतेसाठी महत्त्वाचे पाऊल
आयोगाच्या या निर्णयाचे विद्यार्थी आणि शिक्षकांकडून मोठ्या प्रमाणावर स्वागत करण्यात येत आहे. त्यांनी हे पाऊल पारदर्शकतेसाठी अत्यंत आवश्यक असल्याचे म्हटले. गेल्या काही वर्षांत स्पर्धा परीक्षांमध्ये विविध गैरप्रकार उघडकीस आले होते, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत झाला होता. त्यामुळे ई-केवायसीची सक्ती हे पारदर्शकतेच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे, असे त्यांनी नमूद केले.

‘‘गेल्या काही काळात चुकीच्या माहितीच्या आधारे अर्ज करणारे, बनावट कागदपत्रे दाखवणारे काही उमेदवार निवड प्रक्रियेत पुढे गेले. त्यामुळे खऱ्या पात्र विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. ई-केवायसीमुळे अशा बनावट उमेदवारांना आळा बसेल आणि योग्य उमेदवारांना संधी मिळेल.’’
- एक विद्यार्थी
----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kharadi Rave Party: रेव्ह पार्टी आणि सिक्रेट पार्टी यातील फरक काय? खराडीतील खरंच रेव्ह पार्टी होती का?

आता कल्ला होणार! पुन्हा वाढणार कलर्स मराठीचा टीआरपी; लवकरच येतोय 'बिग बॉस मराठी'; वाचा कधी सुरू होतोय कार्यक्रम

Thane Traffic: ठाणे जिल्ह्याची कोंडी सुटणार! वाहतूक नियंत्रणासाठी अधिसूचना लागू; 'या' भागात नो पार्किंग झोन जारी

Konkan Weather Alert : हवामान विभागाचा अंदाज आला, समुद्र खवळला ; मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा

Mokhada News : मरणोत्तर मरण यातना, स्मशानभूमी नसल्याने पावसात ताडपत्रीचा आधार घेत अंत्यसंस्कार; मोखाड्यातील भिषण वास्तव

SCROLL FOR NEXT