पुणे

राजगुरुनगरला दोन किलोमीटरपर्यंत रांगा

सकाळवृत्तसेवा

राजगुरुनगर - राजगुरुनगर शहरामधून जाणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गावरील भीमा नदीच्या पुलाच्या कठड्याला टेम्पो धडकल्यामुळे वाहतूक अडकून आज गुरुवारी (ता. ४) दुपारपर्यंत वाहतूक कोंडी झाली. यामुळे दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या. वाहतूक कोंडीने वाहनचालक, प्रवासी आणि वाहतूक पोलिसही वैतागून गेले.

आज पहाटे पाचच्या सुमारास हा टेम्पो पुलाच्या कठड्याला धडकून कठड्यावरच अडकला. या घटनेमुळे सकाळपासून वाहतूक कोंडीला सुरुवात झाली. पुण्याच्या बाजूला शिरोलीपर्यंत आणि मंचरच्या बाजूला खेड घाटापर्यंत वाहनांच्या रांगा गेल्या. पोलिसांनी वाहतुकीचे नियमन करूनही वाहतूक कोंडी होतच होती. मुळातच अरुंद असलेल्या भीमा नदीवरील पुलावरच वाहतूक अडकल्यामुळे जास्तच वाहतूक कोंडी झाली. वाहतूक कोंडीतून सुटण्यासाठी चालक आडव्यातिडव्या गाड्या घुसवत होते. त्यातून जास्तच कोंडी होत होती. अर्धा तास राजगुरुनगर ओलांडण्यासाठी लागत होते. त्यामुळे प्रवासी आणि वाहनचालक अक्षरशः वैतागले होते. एस. टी. बस आणि खासगी वाहनाने येणारे राजगुरुनगरकर भीमा नदीच्या पुलाजवळ उतरून पायी गावात येत होते. 

वाडा रस्त्यावरही कोंडी
पुलावरच वाहतूक कोंडी झाल्याने पुढेही सरकता येईना आणि मागेही जाता येईना, अशी अडचण झाली. दुपारपर्यंत वाहतूक कोंडी कमी झाली नव्हती. महामार्गावरच्या या वाहतूक कोंडीमुळे गावातून जाणाऱ्या वाडा रस्त्यावरही वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे राजगुरुनगरमध्ये जाणे-येणे त्रासदायक झाले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Dalit discrimination : देशात अद्यापही दलितांसोबत भेदभाव; चहाच्या टपरीवर दोन प्रकारचे कप : राहुल गांधी

Mumbai Crime: मुंबई-नाशिक महामार्गावर दरोडेखोरांचा थरार, पोलिसाकडूनच ६१ लाखांची लूट, पाच जणांना अटक

Manoj Jarange Maratha Reservation : 'निर्णय झाला नाही तर मुंबईला येणार'; मनोज जरांगे यांचे अंतरवाली सराटीत बारावे आमरण उपोषण सुरू, सरकारला दिला थेट इशारा

Maharashtra Monsoon Prediction : नेपाळच्या पूरस्थितीत अडकलेले संगमनेरचे ४५ पर्यटक सुखरूप भारतात परतले

जीएसटी माफ करण्यासाठी दीड कोटींची मागणी, 40 लाखांची लाच घेताना CGSTचे अतिरिक्त आयुक्त, अधीक्षकासह तिघांना अटक

SCROLL FOR NEXT