Uber
Uber 
पुणे

आर्थिक संकटात सापडलेल्या कॅबचालकांना ‘उबर’ची साथ

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कॅबचालकांसाठी ‘उबर इंडिया’ने मदतीचा हात पुढे केला आहे. कुटुंबाच्या महिन्याच्या गरजा भागतील एवढे पैसे कॅबचालकांच्या बॅंक खात्यात पाठवण्यास गुरुवारपासून  सुरवात केली. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘उबर इंडिया’ने २५ कोटी रुपयांचा ‘उबर केअर ड्रायव्हर फंड’ उभारला आहे. त्यातून उबरने देशातील ५५ शहरांमधील कॅबचालकांना विशिष्ट रक्कम देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, देशातील एकूण किती कॅबचालक आणि त्यांना किती रक्कम देणार, हे ‘उबर’ने जाहीर करण्यास नकार दिला आहे. याविषयी ‘उबर इंडिया’चे अध्यक्ष प्रदीप परमेश्वरन ‘सकाळ’शी बोलताना म्हणाले, ‘सगळेच कॅबचालक सध्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

या वेळी सामाजिक जबाबदारी म्हणून त्यांना मदत केली पाहिजे, अशी कंपनीची भूमिका आहे. त्यासाठीच ड्रायव्हर फंड उभारण्यात आला आहे. एका कॅबचालकाच्या चार आठवड्यांच्या किमान गरजा भागतील, एवढे पैसे त्याच्या बॅंक खात्यात वर्ग करण्यास कालपासून आम्ही सुरुवात केली आहे. हे पैसे चालकाला परत करावे लागणार नाहीत, कंपनीने केलेली मदत आहे, असेही त्यांनी सांगितले.  मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूरमध्ये उबरची सेवा सुरू आहे. या चार शहरांमध्ये कंपनीकडून कॅबचालकांच्या बॅंक खात्यात हा निधी जमा करण्यात येत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मध्यरात्री ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात! 4 जणांचा मृत्यू तर 15 जण जखमी, धक्कादायक व्हिडिओ समोर

मतदारांच्या फायद्याची बातमी! पत्ता बदलण्यासाठी ‘अर्ज क्र.8’ तर यादीत नाव समाविष्टसाठी भरावा लागतो अर्ज क्र. 6; ‘या’ संकेतस्थळावर आजच भरा अर्ज

Latest Marathi News Live Update : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! केरळमध्ये 31 मे रोजी मॉन्सून होणार दाखल

National Dengue Day 2024 : डेंग्यूचे डास जवळपास फिरकणार ही नाहीत, फक्त तुमच्या दिनचर्येत करा 'हे' बदल

मोठी बातमी! विद्यापीठाच्या परीक्षांचा बदलणार पॅटर्न; आता विद्यापीठ घेणार 60 गुणांची परीक्षा तर महाविद्यालयाच्या हाती 40 गुण

SCROLL FOR NEXT