उरुळी देवाची : पीरसाहेब उत्सव कमिटी, ग्रामपंचायत व होळकरवाडीचे ग्रामस्थ यांच्या वतीने गरजू लोकांना रोज जेवणाची सोय करून होळकरवाडी ग्रामस्थांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.
गावातील भाडेकरू, हातावर पोट भरणारे कामगार, मोलमजूर, गरीब यांना उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. याचा विचार करून उत्सव कमिटीने यात्रेसाठी जमा झालेल्या शिल्लक निधीतून गरजू लोकांना भोजन व्यवस्था करण्याचे ठरविले.
या उपक्रमाला ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी सहकार्य केल्याने 3 मे पर्यंत रोज दुपारच्या भोजनाची व्यवस्था जिल्हा परिषद शाळेत केली आहे.
जेवणाचे कीट घेण्यासाठी येताना सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करून प्रत्येकांनी तोंडाला मास्क लावला पाहिजे अशा सूचना जेवणाचा लाभधारकांना दिल्या जात आहेत. याचा फायदा रोज 250 ते 300 गरजूंना होत असल्याने अनेक गरजू व्यक्तींनी समाधान व्यक्त केले.
इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा
गावात कोणीही उपाशी झोपणार नाही याची काळजी ग्रामस्थ घेत असून लॉकडाउन संपेपर्यंत एक वेळच्या भोजनाची व्यवस्था ग्रामस्थांच्या वतीने केली जाणार असल्याची माहिती होळकरवाडीचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष भास्कर झांबरे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.