विश्रांतवाडी : गेले तीन-चार दिवस संध्याकाळी होत असलेल्या मुसळधार पावसामुळे येरवडा, विश्रांतवाडी-धानोरी परिसरात नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साठून राहिल्याने रस्त्याला नदीचे स्वरूप आले होते. त्यामुळे वाहनचालकांना,विशेषतः दुचाकीचालकांना फार कसरत करावी लागली. धानोरीत अनेक ठिकाणी सोसायटीत पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत.
धानोरी येथील भरत ढाब्याजवळील गोयल गंगा ग्रुपच्या गंगा आर्या या सोसायटीत पावसाचे पाणी शिरले आहे. मागील वर्षीही सोसायटीत पाणी शिरले होते. नंतर सीमाभिंत बांधण्यात आली. तरीही सोसायटीत पाणी शिरले आहे. यासंदर्भात बांधकाम व्यावसायिक सुभाष गोयल म्हणाले की, ही समस्या महापालिकेच्या गलथान कारभारामुळे निर्माण झाली आहे. त्यांनी नाल्यावर पूल बांधला आहे, त्यामुळे नाल्याचे पाणी आत शिरले आहे. एकूणच बिल्डर आणि महानगरपालिका यांच्यामध्ये सर्वसामान्य नागरिक भरडला जात आहे, असे दिसते.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पाण्याची पातळी वाढत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. या इमारतीत एकूण 35 कुटुंबे राहत असून त्यात लहान मुले, नवजात बाळे व वृद्धांचाही समावेश आहे. ते सगळे आत अडकले आहेत. पाणी खूप असल्याने 10-12 तास बाहेर पडता आले नाही. येथील एका रहिवाशाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, जर बिल्डर आणि महानगरपालिका आपली जबाबदारी स्वीकारून काही उपाययोजना करत नसतील आणि काही अघटित घडले तर आम्ही कोणाकडे पहावे? सर्वसामान्य नागरिकांचा कोणी वाली आहे की नाही?
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.