Why indian government waiting for to bring back the Indians from tehran 
पुणे

CoronaVirus : भारतीयांना परत आणण्यासाठी सरकार कशाची वाट पहातेय?

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोना विषाणूंच्या उद्रेकामुळे तेहरानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सोडविण्यासाठी केंद्र सरकार का तातडीने पावले उचलत नाही? कोरोनाच्या विषाणूंचा संसर्ग होण्याची टांगती तलवार तेथील नागरिकांवर आहे. त्यातून त्यांच्या जिवाला धोका असतानाही केंद्र सरकार विमान पाठवून नागरिकांना भारतात का आणत नाही, असा सवाल तेथे अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाइकांनी केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

इराणमध्ये कोरोनाच्या विषाणूंचा संसर्ग झाला आहे. इराणची राजधानी असलेल्या तेहरानमध्येही शेकडो भारतीय अडकले आहेत. त्यात कंपनीच्या कामासाठी तेहरान येथे गेलेले दोन तरुणांचाही समावेश आहे. त्यात मुंबई येथील वेदांत कदम (वय 24, वरळी) आणि अरविंद जाधव (वय 50 मुलुंड) हे देखिल तेथे अडकले आहेत.

याबद्दल बोलताना अरविंद यांच्या पत्नी सुषमा जाधव म्हणाल्या, "तेहरान येथून उड्डाण केलेल्या विमानांना भारतातील विमानतळांवर उतरू दिले जात नाही, अशी माहिती मिळत आहे. तेहरान येथून 28 तारखेला उड्डाण करून जाधव भारतात परत येणार होते. पण, ते विमान रद्द केले. आता 16 तारीख दिल्याचे समजते. म्हणजे पंधरा दिवस या भारतीय नागरिकांनी तेथे राहावे लागणार आहे. या दरम्यान, त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला तर, याची जबाबदारी केंद्र सरकार घेणार आहे आहे का?'' इराणमधील नागरिकांना परत भारतात आणण्याचा निर्णय घ्यायला केंद्र सरकार इतकी वाट का पहातंय, अशी संतप्त भावना त्यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ‘’नितीश कुमार यांना भारतरत्न द्या’’, जेडीयू नेते केसी त्यागींची पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे मागणी!

WPL 2026 : Nadine de Klerk ची अष्टपैलू कामगिरी, RCB ने थरारक सामन्यात मारली बाजी; गतविजेत्या MI ची हार

महत्त्वाची बातमी! महापालिका निवडणुकीचा प्रचार मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता थांबणार; उमेदवारांचे पदयात्रा, घरोघरी भेटींवर भर, सोशल मिडियाचा वापर, वाचा...

Rahul Gandhi Attacks on BJP : दूषित पाणी, विषारी कफ सिरप ते अंकिता भंडारी हत्या ; राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात!

HSC Hall Ticket 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' दिवसापासून मिळणार!

SCROLL FOR NEXT