MP Adhalrao Patil sakal
पुणे

Adhalrao Patil : पराभवाने खचून न जाता यापुढे जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी लढणार आहे; आढळराव पाटील

जातीपातीच्या दलदलीत माझा बळी गेला

डी. के. वळसे पाटील

मंचर : सन २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत मी पराभूत झालो. दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो. विद्यमान खासदारापेक्षा एक हजार ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी आणला. घरदार सोडून सतत जनतेच्या कामासाठी संपर्क ठेवला. यावेळी यश मिळेल अशी अपेक्षा होती. निकाल लागला वाईट वाटले. जातीपातीच्या दलदलीत माझा बळी गेला. काम न करता व संपर्क न ठेवता निवडून येतात ही लोकशाहीची चेष्टा आहे. पराभवाने खचून न जाता कामाचा वसा पुढे चालू ठेवणार आहे. रडायचे नाही लढायचे. आगामी विधानसभा निवडणुकीत पाचही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून येण्यासाठी जीवाचे रान करणार आहे.” अशी ग्वाही माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.

मंचर (ता.आंबेगाव) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहविचार सभेत आढळराव पाटील बोलत होते. यावेळी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. शिरूर लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकाल लागल्यानंतर प्रथमच आढळराव पाटील कार्यकर्त्यांना संबोधित करणार होते. त्यामुळे सभेला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

आढळराव पाटील म्हणाले, “आपल्यात राहून ज्यांनी विरोधी काम केले त्यांची नोंद वळसे पाटील व आमदार अतुल बेनके यांनी घ्यावी. यापुढे दगाफटका होऊ नये याची आतापासूनच खबरदारी घ्यावी. कार्यकर्त्यांना कशी मदत करावी याचे आदर्श उदाहरण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आहेत. रात्र दिवस करून पवार साहेबांनी मला प्रेरणा व प्रोत्साहन देण्याचे काम केले. दिलीप वळसे पाटील यांचा अपघात झाला नसता तर आंबेगावची परिस्थिती वेगळी असते. मी तुमच्याबरोबर मैदानात नाही. अशी खंत वळसे पाटील यांनी मला अनेक वेळा बोलून दाखवली. त्यांची होणारी तगमग मी जवळून पहिली आहे. ते मैदानात असते तर १५ ते २० हजाराचे मताधिक्य आंबेगावमधून वाढले असते. बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वळसे पाटील व मी पुढाकार घेतला असून दिवसा थ्री फेज वीज कृषी पंपांना मिळण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांचे खरे कैवारी आम्ही आहोत. केंद्रात महायुतीचे सरकार आले आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वाधिक लोक प्रतिनिधी निवडून आले पाहिजेत.”

आमदार अतुल बेनके म्हणाले, “येत्या पावसाळी आधिवेशनात शेतकऱ्यानसाठी क्रांतिकारक निर्णय राज्यसरकार घेणार आहे. डिंभे धरणाला बोगदा पाडून शेतकऱ्यांचे पाणी पळविण्याचा डाव वळसे पाटील, आढळराव पाटील व मी हाणुन पडणार आहे. त्यासाठी अजित दादा पवार छातीची ढाल करून उभे राहणार आहेत. लोकसभा निवडणूक निकालानंतर कुठेही सत्कारासाठी गर्दी लोटली. असे पहावास मिळाले नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील सर्व आमदार व कार्यकर्ते कुठेही जाणार नाहीत. दिशाभूल करण्यासाठी सोशल मिडियावर खोट्या बातम्या फेरल्या जातात. आढळराव पाटील यांच्या झालेला पराभव हळहळ व्यक्त करणारा आहे. कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागावे."अंकित जाधव यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT