Air India set to lay off 200 staff to recast business Sakal
Personal Finance

Air India Layoffs: एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का; इतक्या कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

Air India Layoffs: टाटा समूहाची विमान कंपनी एअर इंडियालाही कर्मचारी कपातीचा सामना करावा लागला आहे. कंपनीने अलीकडेच 180 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.

राहुल शेळके

Air India Layoffs: टाटा समूहाची विमान कंपनी एअर इंडियालाही कर्मचारी कपातीचा सामना करावा लागला आहे. कंपनीने अलीकडेच 180 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. (Air India set to lay off 200 staff to recast business)

एअर इंडियामध्ये 18,500 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत तर ग्रुप एअरलाइन, एअर इंडिया एक्सप्रेसमध्ये सुमारे 6,200 कर्मचारी आहेत. जेव्हा टाटा समूहाने विमान कंपनी विकत घेतली तेव्हा दोन्ही एअरलाइन्समध्ये कंत्राटी कामगारांसह अंदाजे 13,000 कर्मचारी होते.

या प्रकरणी एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही या प्रक्रियेदरम्यान सर्व कराराच्या जबाबदाऱ्यांचा आदर करत आहोत. कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या पत्रानुसार, कपात केलेल्या कर्मचाऱ्यांना एअरलाइनच्या प्रत्येक वर्षाच्या सेवेसाठी 15 दिवसांच्या पगाराच्या बरोबरीत भरपाई पॅकेज मिळेल.

एअरलाइनने यापूर्वी दोनदा स्वैच्छिक सेवानिवृत्ती योजना ऑफर केल्या होत्या ज्याचा 2,500 हून अधिक कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला होता.

तोट्यात चाललेली एअर इंडिया टाटा समूहाने जानेवारी 2022मध्ये सरकारकडून खरेदी केली होती. तेव्हापासून त्यांचे बिझनेस मॉडेल पुन्हा रुळावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

टाटांनी जानेवारी 2022 मध्ये एअर इंडिया विकत घेतली होती

एअर इंडियाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की कपात झालेले कर्मचारी VRS योजना आणि री-स्किलिंगच्या संधींचा वापर करू शकले नाहीत. तोट्यात चाललेली एअर इंडिया टाटा समूहाने जानेवारी 2022 मध्ये सरकारकडून ताब्यात घेतली.

एअर इंडिया एक जागतिक विमान कंपनी म्हणून स्वत:ला प्रस्थापित करण्याच्या दिशेने काम करत आहे. जानेवारी 2022 मध्ये जेव्हा टाटा समूहाने कंपनी विकत घेतली तेव्हा सुमारे 13,000 कर्मचारी तेथे काम करत होते.

आता सुमारे 18,000 कर्मचारी एअरलाइनमध्ये काम करत आहेत. एअरलाइन्सचे लक्ष आता तरुण कर्मचाऱ्यांवर आहे आणि त्यांना कामावर घेतले जात आहे. जुन्या कर्मचाऱ्यांना व्हीआरएस आणि रि-स्किलिंगची संधी देण्यात आली. या दोन्हीमध्ये पास न झालेल्या कर्मचाऱ्यांना आता कामावरून काढून टाकण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाने कॅन्टीन सेवा, स्वच्छता आणि एसी सेवेतील कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. यापूर्वी 12 मार्च रोजी एअरलाइनने 53 कर्मचाऱ्यांना बाहेर काढले होते. भारत सरकारने एअर इंडियाला सांगितले होते की, ते किमान 1 वर्ष कोणालाही कामावरून काढून टाकणार नाहीत. त्यानंतर VRS ची सुविधा दिली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ताडोबातील खाण प्रकल्पाला अखेर मंजुरी; राज्य वन्यजीव मंडळातील सदस्यांचा विरोध डावलत सरकारचा निर्णय...

Kolhapur : आईच्या शेवटच्या साडीने वाचले दीड लाख; सय्यद कुटुंबाची आयुष्याची पुंजी भस्मसात, दिवसभर कचऱ्यात राबणारे हात थरथरले

Latest Marathi News Live Update : काँग्रेसचा जाहीरनामा जाहीर केला जाणार

Amravati fire: टर्पेंटाइन पॅकिंग उद्योगात आग; एक ठार, अमरावती एमआयडीसीमधील धक्कादायक घटना, मृत महिला वर्धेची!

Hinjewadi News : हिंजवडीत संगणक अभियंत्याने आईला मेसेज करून संपविले जीवन

SCROLL FOR NEXT