foreign direct investment increase industrial sector Sakal
Personal Finance

Investment: उद्योग क्षेत्रात थेट परकी गुंतवणूक वाढणार; मोठ्या कर्मचारी भरतीसाठी कंपन्या सज्ज

Investment: देशातील उद्योग क्षेत्राने नववर्ष सर्वच पातळ्यांवर उत्तम वाढीचे ठरण्याची आशा व्यक्त केली आहे. कर्मचारी भरती, कंपन्यांचे आर्थिक निकाल, थेट परकी गुंतवणूक यात जोरदार वाढ होईल, असा विश्वास अनेक व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली: देशातील उद्योग क्षेत्राने नववर्ष सर्वच पातळ्यांवर उत्तम वाढीचे ठरण्याची आशा व्यक्त केली आहे. कर्मचारी भरती, कंपन्यांचे आर्थिक निकाल, थेट परकी गुंतवणूक यात जोरदार वाढ होईल, असा विश्वास अनेक व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे. मार्च तिमाहीत देशात जागतिक स्तरावरील प्रमाणापेक्षा अधिक कर्मचारी भरती होण्याची अपेक्षा असून, सुमारे ३७ टक्के कंपन्यांनी कर्मचारी भरती करण्यासाठी अनुकूलता दर्शविल्याचे एका सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे.

देशात एप्रिल किंवा मे महिन्यात सार्वजनिक निवडणुका होणार आहेत. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था अधिक वेगवान प्रगती करण्याची अपेक्षा आहे. तसेच ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थाही चांगली वाढ दर्शवित आहे.

अनेक जागतिक कंपन्या भारतात गुंतवणूक वाढवित आहेत. त्यामुळे नव्या वर्षात व्यवसायाची उत्तम वाढ होईल परिणामी, कर्मचारीभरती वाढवावी लागेल, असे कंपन्यांच्या प्रमुखांनी म्हटले आहे. देशांतर्गत मागणी वाढण्याच्या परिस्थितीमध्ये मार्च तिमाहीसाठी कर्मचारी संख्या वाढविण्याची योजना आखल्याचेही कंपन्यांनी स्पष्ट केले आहे.

मॅनपॉवर ग्रुप इंडिया कंपनीने एम्प्लॉयमेंट आउटलुक सर्वेक्षणाअंतर्गत विविध क्षेत्रांमधील सुमारे ३१०० कंपनी प्रमुखांकडून याबाबत मते जाणून घेण्यात आली. या अहवालानुसार, देशातील कर्मचारीभरती वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारताचा ‘नेट एम्प्लॉयमेंट आउटलूक’ ४१ देशांमध्ये सर्वाधिक आहे, असेही यात म्हटले आहे.

या सर्वेक्षणानुसार, भारत आणि नेदरलँड्सने रोजगारवाढीबाबत सर्वांत उत्तम ३७ टक्के कल नोंदविला आहे, त्यानंतर कोस्टा रिका आणि अमेरिकेने ३५ टक्के, तर मेक्सिकोने ३४ टक्के कल नोंदविला आहे. याबाबतची जागतिक सरासरी २६ टक्के आहे.

वित्तीय आणि रिअल इस्टेट उद्योगातील व्यवसायांनी माहिती तंत्रज्ञान व ग्राहकोपयोगी वस्तू आणि सेवांनंतर सर्वांत चांगली वाढ होण्याची अपेक्षा वर्तविली आहे. वित्तीय आणि रिअल इस्टेटने ४५ टक्के, माहिती तंत्रज्ञान क्षेत्राने ४४ टक्के व ग्राहक वस्तू आणि सेवा क्षेत्राने ४२ टक्के वाढीची अपेक्षा नमूद केली आहे. ऊर्जा क्षेत्रात सर्वांत कमी २८ टक्के कल दिसल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे.

देशात ८१ टक्के कंपन्यांनी कुशल प्रतिभा शोधण्यात अडचणी आल्याचे म्हटले आहे. २०२३ मधील सर्वेक्षणातील प्रमाणाच्या तुलनेत यात एक टक्का वाढ झाली आहे. यामध्ये वाहन उत्पादन, वाहतूक क्षेत्रांवर सर्वाधिक परिणाम झाल्याचे आढळले आहे.

त्यानंतर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रावर परिणाम जाणवला आहे. कंपन्या परिवर्तनाच्या टप्प्यात आहेत परंतु, अपेक्षित कौशल्ये असलेले मनुष्यबळ मिळण्याचे प्रमाण कमी आहे, असे ‘मॅनपॉवर ग्रुप इंडिया ’चे व्यवस्थापकीय संचालक संदीप गुलाटी यांना सांगितले.

कुशल, प्रतिभावान कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या वेतनवाढीसह, कामाच्या पद्धतीत लवचिकताही देत आहेत. माहिती तंत्रज्ञान, विक्री व विपणन, अभियांत्रिकी, वाहतूक व मनुष्यबळ व्यवस्थापन ही पाच सर्वाधिक मागणी असलेली कौशल्य क्षेत्रे असून, कंपन्यांनी कर्मचारी भरतीबाबत आखलेल्या धोरणात कर्मचारी कल्याण, कुशल भूमिकांसाठी भरती आणि एआय आणि तंत्रज्ञानाचा अवलंब याला प्राधान्य दिले आहे, असेही गुलाटी यांनी सांगितले.

देशांतर्गत मागणी वाढली असून, खासगी गुंतवणुकीचा ओघ सुरूच आहे. राजकीय क्षेत्रात स्थिरता, प्रगतीशील भारत हे स्वप्न नसून वास्तव आहे,

— संदीप गुलाटी, व्यवस्थापकीय संचालक,

मॅनपॉवर ग्रुप इंडिया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Adityanath Mobile Number: अधिकारी काम करत नाहीत? CM योगींकडे करा थेट तक्रार! मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा मोबाईल नंबर

Harbhajan Singh : रोहित शर्माला ODI कर्णधारपदावरून हटवल्याने हरभजन सिंग खवळला, शुभमन गिलबाबत म्हणाला...

Marathi Movie : तरूणाईला प्रेमाचा जादुई अनुभव देणारं ‘ये ना पुन्हा’ गाणं प्रदर्शित!

Ajit Agarkar: रोहित शर्मासाठी परतीचा प्रवास सुरू? कर्णधारपदावरून दूर करण्याची माहिती दिली होती,आगरकर

Kolhapur Bhishi Scam : विश्वासू मित्र म्हणून भिशी भरायला दिली, अन् ४० महिलांना पती, पत्नीने २५ लाखांना गंडवलं...; कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT