gautam adani manmohan singh  Sakal
Personal Finance

Gautam Adani: पाया घातला मनमोहन सिंगांनी अन् पीएम मोदी झाले कळस! गौतम अदानींनी वाहिली स्तुतिसुमने

Gautam Adani on Manmohan Singh & Narendra Modi: अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे कौतुक केले आहे. गौतम अदानी म्हणाले की, 1991 मध्ये जाहीर केलेल्या उदारीकरण धोरणाने भारताच्या पायाभूत सुविधांचा पाया घातला.

राहुल शेळके

Manmohan Singh: अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे कौतुक केले आहे. गौतम अदानी म्हणाले की, 1991 मध्ये जाहीर केलेल्या उदारीकरण धोरणाने भारताच्या पायाभूत सुविधांचा पाया घातला.

मुंबईत क्रिसिलच्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना गौतम अदानी म्हणाले की, भारताच्या पायाभूत सुविधांच्या विकासाची तयारी 1991 मध्येच सुरू झाली होती. 1991 ते 2014 हा कालावधी अर्थव्यवस्थेचा पाया घालण्यात गेला. 2014 ते 2024 हा काळ देशासाठी टेक ऑफचा आहे.

ते म्हणाले की, मनमोहन सिंग यांनी देशातील परवाना राज संपवला. परवाना राज मोडल्याने सरकारने बहुतांश क्षेत्रांसाठी औद्योगिक परवाने काढून टाकले. त्यामुळे व्यवसायांना गुंतवणूक करण्याची किंवा किमती निश्चित करण्याची संधी मिळाली. गौतम अदानी म्हणाले, "गेल्या दशकात भारताने पायाभूत सुविधा क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे.''

अदानी समूह हरित ऊर्जा उत्पादनात 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार

गौतम अदानी म्हणाले की, गेल्या दशकात भारतात पायाभूत सुविधांचा प्रचंड विकास झाला आहे. त्यांनी नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाइपलाइन (एनआयपी) बद्दलही मत व्यक्त केले. ते पुढे नेण्यासाठी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राला एकत्र यावे लागेल, असे ते म्हणाले.

देशात ऊर्जा, पाणी, विमानतळ आणि सामाजिक पायाभूत सुविधांवर प्रचंड काम झाले आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, अदानी समूहाला हरित ऊर्जा उत्पादनासाठी आवश्यक असलेले सर्व प्रमुख भाग तयार करायचे आहेत. यासाठी ते 100 अब्ज डॉलर्स (सुमारे 8340 कोटी रुपये) पेक्षा जास्त गुंतवणूक करणार आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेकडून आपल्या अपेक्षांबद्दल बोलताना ते म्हणाले, 'भारताचा विकास ज्या वेगाने होत आहे आणि ज्या पद्धतीने सरकार सामाजिक आणि आर्थिक सुधारणा राबवत आहे, ते पाहता मला वाटते की पुढील दशकात भारताचा जीडीपी दर 12 ते 18 वर्षांनी 1 ट्रिलियन डॉलर्सने वाढवण्यास सुरुवात करेल.

भारत 2050 पर्यंत 30 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनेल. अदानींचा अंदाज आहे की पुढील 26 वर्षात शेअर बाजार भांडवल 40 ट्रिलियन डॉलर ओलांडेल, सध्या भारताचे बाजार भांडवल सुमारे 5 ट्रिलियन डॉलर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT