Hotel Company Sakal
Personal Finance

अर्थभान : हॉटेल कंपन्यांची भरभराट

भारतातल्या मुख्य आठ शहरांतून विश्वकप स्पर्धेचे क्रिकेट सामने दिवसरात्र खेळले जाणार आहेत. यामुळे तिथल्या हॉटेल व्यवसायाला उभारी येण्याची शक्यता आहे.

गोपाळ गलगली

भारतात पाच ऑक्टोबरपासून सुरू होणारे आणि तब्बल ४५ दिवस चालणारे विश्वकप स्पर्धेचे क्रिकेट सामने धमाल उडवून देणार आहेत. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आदी आठ देशांतून क्रिकेट संघ आणि प्रेक्षकांचे जथ्थे भारतात उतरणार आहेत. त्यात या खेळाच्या एतद्देशीय लाखो चाहत्यांची भर पडणार आहे.

भारतातल्या मुख्य आठ शहरांतून हे सामने दिवसरात्र खेळले जाणार आहेत. यामुळे तिथल्या हॉटेल व्यवसायाला उभारी येण्याची शक्यता आहे. यासंदर्भात नुकतीच एक बातमी वाचली. त्यानुसार, अहमदाबाद येथील हॉटेलचे दर भारत-पाक सामन्याच्या कालावधीसाठी ५० हजार रुपयांपर्यंत वाढले आहेत. सध्या हा दर ६,५०० रुपये ते १० हजार रुपये आहे. यावरून हॉटेल व्यवसायाला किती लाभ होणार आहे, हे लक्षात येईल.

‘ईक्रा’च्या अहवालानुसार हॉटेल व्यवसायाची वाढ दुहेरी अंकात होण्याची शक्यता आहे. ही वाढ १३ ते १५ टक्के असेल. क्रिकेट सामन्यांशिवाय जी-२० बैठका, अमेरिकी कंपन्याशी करार, लग्नसराई अशा अनेक कारणांमुळेही हॉटेल व्यवसायाच्या वाढीला चालना मिळणार आहे.

थोडक्यात, भारताची आर्थिक परिस्थिती वेगाने सुधारत असून, लोकांचे उत्पन्नही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे लोकांची खर्च करण्याची प्रवृत्तीही वाढत आहे. त्याचा लाभ हॉटेल व्यवसायाला होणार आहे. त्यामुळे या क्षेत्रातील उत्तम कंपन्यांचे शेअरही चांगला नफा देऊ शकतील. त्याकडे गुंतवणूकदारांनी लक्ष देणे आवश्यक आहे.

(लेखक ज्येष्ठ गुंतवणूकतज्ज्ञ आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतोय! सिद्धरामय्यांची घोषणा, डीके शिवकुमार यांनी चरणस्पर्श करत घेतले आशीर्वाद

Manoj Jarange: ३० मेपासून तळपत्या उन्हात आमरण उपोषण, जीव गेला तर फडणवीस जबाबदार... मनोज जरांगे यांची कठोर भूमिका!

Washim Accident: आनंदाचा क्षण काळ ठरला! धोंड्याच्या जेवणावरून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, अपघातात दोन चिमुकल्यांसह वडिलांचा मृत्यू..

Kalyan Crime : ६ महिन्यांपूर्वी लग्न केलेल्या २५ वर्षीय लेकीची हत्या, वडिलांवरच संशय; काय घडलं?

Asian Relay India Host: भारताला मिळाली सर्वात मोठी गूड न्यूज! आशियाई स्पर्धांचे यजमानपद बहाल; पण सामने 'या' दोन शहरांत का होणार?

SCROLL FOR NEXT