Home-cooked veg thali became 8 percent costlier in April than last year Report  Sakal
Personal Finance

Veg Thali Price: एप्रिल महिन्यात शाकाहारी थाळी 8 टक्क्यांनी झाली महाग; काय आहे कारण?

Veg Thali Prices: एप्रिल महिन्यात शाकाहारी थाळीची किंमत 8 टक्क्यांनी वाढून 27.4 रुपये झाली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात शाकाहारी थाळीची किंमत 25.4 रुपये होती. कांदा, टोमॅटो, बटाटा महागल्याने शाकाहारी थाळीच्या दरात वाढ झाली आहे.

राहुल शेळके

Veg Thali Prices: एप्रिल महिन्यात शाकाहारी थाळीची किंमत 8 टक्क्यांनी वाढून 27.4 रुपये झाली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात शाकाहारी थाळीची किंमत 25.4 रुपये होती. कांदा, टोमॅटो, बटाटा महागल्याने शाकाहारी थाळीच्या दरात वाढ झाली आहे. बुधवारी प्रसिद्ध झालेल्या क्रिसिलच्या 'रोटी-राइस रेट' अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

ब्रॉयलर स्वस्त झाल्याने मांसाहारी थाळीचे भाव कमी झाले

रेटिंग एजन्सी क्रिसिलच्या 'रोटी-राईज रेट' अहवालानुसार, स्वस्त ब्रॉयलरमुळे, मांसाहारी थाळीची किंमत याच कालावधीत 58.9 रुपयांवरून 56.3 रुपयांवर आली आहे आणि ती 4 टक्क्यांनी घसरली आहे.

शाकाहारी थाळीमध्ये सामान्यतः रोटी, भाज्या (कांदे, टोमॅटो आणि बटाटे), तांदूळ, डाळ, दही आणि सॅलड यांचा समावेश होतो. मांसाहारी थाळीचे घटक व्हेज थाळीसारखेच आहेत, त्यात फक्त चिकनचा समावेश आहे. CRISIL उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम भारतातील सरासरी किमतींच्या आधारे थाळीचा खर्च काढला जातो.

“पश्चिम बंगालमधील रब्बी क्षेत्रामध्ये लक्षणीय घट आणि बटाटा पिकाचे नुकसान झाल्यामुळे कांद्याची आवक कमी झाल्यामुळे किमतीत वाढ झाली,” असे क्रिसिलने म्हटले आहे.

तांदूळ आणि डाळींच्या किमती देखील अनुक्रमे 14 टक्के आणि 20 टक्क्यांनी वाढल्या आहेत. जिरे, मिरची आणि वनस्पती तेलाच्या किमती अनुक्रमे 40 टक्के, 31 टक्के आणि 10 टक्क्यांनी घसरल्या, त्यामुळे व्हेज थाळीच्या किमती आणखी वाढल्या नाहीत.

ब्रॉयलर आणि चिकनच्या दरात वार्षिक 12 टक्के घट झाल्याने मांसाहारी थाळीच्या किमतीत घट झाली आहे. मांसाहारी थाळीच्या एकूण खर्चापैकी 50 टक्के वाटा ब्रॉयलरचा असतो.

टोमॅटो आणि बटाट्याच्या दरात वाढ सुरूच आहे

मागील महिन्याच्या म्हणजेच मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये कांद्याच्या किमतीत 4 टक्के आणि इंधनाच्या किमतीत 3 टक्के घट झाल्याने शाकाहारी थाळीचे भाव स्थिर राहिले. टोमॅटो आणि बटाट्याचे भाव वाढतच आहेत.

क्रिसिलने आपल्या अहवालात म्हटले आहे की, रब्बी पीक कमी झाल्यामुळे कांद्याचा पुरवठा कमी झाला आहे, तर पश्चिम बंगालमध्ये बटाटा पिकाचे नुकसान झाले आहे त्यामुळे बटाट्याचे भाव वाढले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत तांदूळ आणि डाळीचे भाव वाढले आहेत.

चवळीच्या दरात 14 टक्के तर डाळींच्या दरात 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुसरीकडे, ब्रॉयलर चिकनच्या दरात 12 टक्के घट झाल्याने मांसाहारी थाळी स्वस्त झाली आहे. क्रिसिल मार्केट इंटेलिजन्स अँड ॲनालिटिक्सचे संचालक पूशन शर्मा म्हणाले की, येत्या काही दिवसांत भाज्यांच्या किमती वाढतच जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT