Income certificate to given after five years Sanjay Gandhi Shravanbal Yojana condition relaxed  sakal
Personal Finance

Income Certificate : उत्पन्नाचा दाखला पाच वर्षांनी द्यावा लागणार; संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेसाठी अट शिथिल

केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून आर्थिक साहाय्य

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांना दरवर्षी एप्रिल ते जून या कालावधीत उत्पन्नाचा दाखला द्यावा लागत असे, यापुढे मात्र राज्य सरकारने लाभार्थ्यांना दरवर्षी उत्पन्नाचा दाखला मिळविण्यास अडचणी येत असल्याने दरवर्षी उत्पन्नाचा दाखला सादर न करता ५ वर्षातून एकदा उत्पन्नाचा दाखला सादर करण्यास अनुमती दिली आहे . तशा प्रकारचा आदेश आज जारी करण्यात आला आहे.

जवळपास ४१ लाखजण या योजनेचे लाभार्थी आहेत. संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून शासनाकडून १८ ते ६४ वयोगटातील निराधार व्यक्ती, दिव्यांग, अनाथ मुले, घटस्फोटित स्त्रिया, दुर्लक्षित स्त्रिया, वेश्या व्यवसायातून मुक्त महिला, तसेच तृतीयपंथीयांना शासनाकडून आर्थिक साहाय्य पुरविले जाते. याशिवाय, श्रावणबाळ योजनेअंतर्गत राज्यातील ६५ व त्यापेक्षा अधिक वयाच्या दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या स्त्रियांना व पुरुषांना केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून आर्थिक साहाय्य पुरविले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Block: नीट परीक्षेसाठी रविवारी दिवसा मेगाब्लॉक रद्द; मध्य व ट्रान्स हार्बर मार्गावर मध्यरात्री विशेष ब्लॉक

IPL 2026 : “वैभव सूर्यवंशीची नेमकी कमजोरी शोधणे कठीण”; इयान बिशप यांनी RR च्या युवा फलंदाजाचे केले कौतुक

Latest Marathi News Live Update : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोल नाक्यावर लांबच लांब रांगा

Mumbai Sea Transport: आखाती तणावाचा मुंबई सागरी वाहतुकीवर फटका; इंधनदरवाढीमुळे रो-रो व फेरी बोटींच्या भाडेवाढीची शक्यता

Indian Culture Board Game: दादरच्या साहिलराजे शिर्केचा ‘मुमुक्षू’ देशभर गाजतोय; भारतीय जीवनमूल्यांवर आधारित बोर्ड गेम मोबाईलला टक्कर

SCROLL FOR NEXT