Life Insurance policy Rule Change Sakal
Personal Finance

Life Insurance: विमा पॉलिसीचे नियम बदलले; पॉलिसी सरेंडर केल्यावर मिळणार जास्त पैसे, रिटर्नवरही होणार मोठा परिणाम

Life Insurance policy Rule Change: आजपासून म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून आयुर्विमा पॉलिसीच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. आता पॉलिसीधारक सहजपणे पॉलिसी सरेंडर करू शकतील, असे केल्याने त्यांना अधिक परतावा मिळेल आणि योजना बदलणे देखील सोपे होईल.

राहुल शेळके

Life Insurance policy Rule Change: आजपासून म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून आयुर्विमा पॉलिसीच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. आता पॉलिसीधारक सहजपणे पॉलिसी सरेंडर करू शकतील, असे केल्याने त्यांना अधिक परतावा मिळेल आणि योजना बदलणे देखील सोपे होईल.

या बदलांचा परिणाम विशेषत: पारंपारिक जीवन विमा उत्पादनांवर होईल. ज्यात बोनस-आधारित (पार) आणि गैर-सहभागी (नॉन-पार) पॉलिसी समाविष्ट आहेत.

नवीन नियमांनुसार, पॉलिसीधारकांना आता पहिल्या वर्षापासूनच गॅरंटीड सरेंडर व्हॅल्यू मिळेल. यापूर्वी ही सुविधा दुसऱ्या वर्षापासून उपलब्ध होती. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की ज्यांनी पॉलिसी दीर्घकाळ ठेवली आहे त्यांना यापेक्षा कमी परतावा मिळू शकतो. नॉन-पार पॉलिसींवरील परतावा 0.3-0.5 टक्क्यांनी कमी होऊ शकतो.

एक वर्षानंतर तुम्हाला किती पैसे परत मिळतील?

एका पॉलिसीधारकाने 5 लाख रुपयांच्या विमा रकमेसह 10 वर्षांची पॉलिसी खरेदी केली. पहिल्या वर्षी त्याने 50 हजार रुपये प्रीमियम भरला. जुन्या नियमांनुसार, जर त्याने एक वर्षानंतर पॉलिसी सोडली असती तर त्याला कोणताही परतावा मिळाला नसता.

म्हणजेच त्याचे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले असते. परंतु नवीन नियमांनुसार, एका वर्षानंतर पॉलिसी सोडली तरी त्याला परतावा मिळेल. जर विमा कंपनीला संपूर्ण वर्षासाठी प्रीमियम मिळाला असेल, तर पॉलिसीधारकाला 31,295 रुपये परत करावे लागतील.

पॉलिसी सरेंडरवर जास्त परतावा

इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, सेबीचे नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आणि Sahajamoney.com चे संस्थापक अभिषेक कुमार म्हणतात की, पूर्वीच्या नियमांनुसार, जर पॉलिसी चौथ्या आणि सातव्या वर्षाच्या दरम्यान सरेंडर केली गेली असेल तर, 50 टक्के रक्कम भरणे बंधनकारक होते.

समजा पॉलिसीचा एकूण प्रीमियम 2 लाख रुपये आहे. जर तुम्ही 4 वर्षांनंतर पॉलिसी सरेंडर केली, तर आधीच्या सरेंडर व्हॅल्यू नियमांनुसार, तुम्हाला सरेंडर व्हॅल्यू म्हणून 1.2 लाख रुपये परत मिळतील. आता लागू केलेल्या नवीन नियमांनुसार, पॉलिसी सरेंडर केल्यावर 1.55 लाख रुपये परत केले जातील.

कंपन्यांवर काय परिणाम होईल?

टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, गेल्या चार महिन्यांत सरकारी बाँडचे दर 7.10% वरून 6.8% पर्यंत घसरले असल्याने, विमा कंपन्यांनी आतापर्यंत त्यांच्या उत्पादनांवर अंतर्गत परताव्याचा दर (IRR) कायम ठेवला आहे. नवीन नियमांसह, विमा कंपन्या त्यांच्या उत्पादनांमध्ये बदल करू शकतात, ज्यामुळे IRR कमी होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

IND vs ENG 2nd Test: इंग्लंडच्या खेळाडूने रिषभ पंतला दाखवलं 'आमिष'; आपल्या पठ्ठ्याने काय उत्तर दिले पाहा, Viral Video

SCROLL FOR NEXT