Ramdev Baba News : योगगुरू रामदेव यांनी रविवारी सांगितले की, कॉर्पोरेट 99 टक्के वेळ स्वतःच्या फायद्यासाठी वापरतात, तर संताचा काळ हा सर्वांच्या भल्यासाठी असतो. अंबानी आणि अदानी यांसारख्या अब्जाधीशांनी घालवलेल्या वेळेपेक्षा तीन दिवसांचा इथला मुक्काम अधिक मौल्यवान असल्याचेही ते म्हणाले.
रामदेव त्यांचे सहकारी आचार्य बालकृष्ण यांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते, ज्यामध्ये मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक उपस्थित होते.
रामदेव बाबा म्हणाले की, “मी हरिद्वारहून तीन दिवसांसाठी येथे आलो आहे. माझ्या वेळेची किंमत अदानी, अंबानी, टाटा आणि बिर्ला यांच्यापेक्षा जास्त आहे. कॉर्पोरेट्स त्यांचा 99% वेळ स्वतःच्या हितासाठी वापरतात, तर संतांचा वेळ सर्वांच्या फायद्यासाठी असतो.''
पतंजलीसारखी साम्राज्ये निर्माण झाली पाहिजेत :
या आर्थिक वर्षात पतंजलीला 40,000 कोटी रुपयांची उलाढाल करणारी कंपनी बनवल्याबद्दल त्यांनी बालकृष्णाचे कौतुक केले. ते म्हणाले की ''भारताला 'गौरवशाली' बनवायचे असेल तर पतंजलीसारखी साम्राज्ये निर्माण करावी लागतील.''
रामदेव बाबा पुढे म्हणालेकी, “कर्करोग खूप पसरला आहे. कोरोना महामारीनंतर या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. लोकांची दृष्टी, ऐकण्याची क्षमता गमावली आहे.”
या महिन्याच्या सुरुवातीला, रामदेव यांनी राजस्थानच्या बारमेर जिल्ह्यात 2 फेब्रुवारी रोजी झालेल्या संतांच्या सभेत मुस्लिमांवर दहशतवाद आणि हिंदू महिलांवर आरोप लावले. त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर पुन्हा एकदा वाद निर्माण झाला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.