IT Companies Headcount Sakal
Personal Finance

Employee Count: आर्थिक मंदीची चाहूल? देशातील आघाडीच्या टॉप 3 आयटी कंपन्यांमध्ये 63,759 कर्मचारी झाले कमी

IT Companies Headcount: आयटी क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. देशातील टॉप 3 आयटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत घसरण दिसून आली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), इन्फोसिस आणि विप्रो यांनी दोन दशकांनंतर प्रथमच त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत घसरण नोंदवली आहे.

राहुल शेळके

IT Companies Headcount: आयटी क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. देशातील टॉप 3 आयटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत घसरण दिसून आली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), इन्फोसिस आणि विप्रो यांनी दोन दशकांनंतर प्रथमच त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत घसरण नोंदवली आहे. TCS, Infosys आणि Wipro या तिन्ही कंपन्यांनी सांगितले की 20223-24 या आर्थिक वर्षात त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे.

TCS (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) 12 एप्रिल रोजी तिमाही निकाल जाहीर करणाऱ्या तीन IT कंपन्यांपैकी पहिली होती. कंपनीने सांगितले की 2023-24 आर्थिक वर्षाच्या शेवटी, TCS ची कर्मचारी संख्या 601,546 वर आली आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या तुलनेत कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत 13,249 कर्मचाऱ्यांची घट झाली आहे. 2022-23 मध्ये कंपनीची कर्मचारी संख्या 614,795 होती.

18 एप्रिल 2024 रोजी, इन्फोसिसने त्यांचे तिमाही निकाल जाहीर केले आणि कंपनीने सांगितले की 2023-24 या आर्थिक वर्षात, इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत 25,994 ने घट झाली आहे.

इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट होण्याची गेल्या 23 वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. 2023-24 या आर्थिक वर्षाच्या शेवटी, इन्फोसिसची कर्मचारी संख्या 3,17,240 होती, जी मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 7.5 टक्के कमी आहे. 2022-23 आर्थिक वर्षाच्या शेवटी, इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांची संख्या 3,43,234 होती.

2023-24 या आर्थिक वर्षात विप्रोच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. विप्रोच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत 24,516 ने घट झाली असून कंपनीची एकूण कर्मचारी संख्या 2,34,054 वर आली आहे. या तीन मोठ्या आयटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांची संख्या 63,759 ने कमी झाली आहे.

जगभरातील मागणीत होणारी घसरण आणि ग्राहकांनी तंत्रज्ञानावरील खर्च कमी केल्यामुळे या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि भू-राजकीय चढ-उतारांमुळे भारताच्या IT सेवा उद्योगावर संकट निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT