संपादकीय

'वंचित'ने नव्हे; काँग्रेसनेच स्वत:ला संपविले : ऍड. प्रकाश आंबेडकर 

ऍड. प्रकाश आंबेडकर

काँग्रेसचं राज्यातलं राजकारण संपलं आणि आमचं सुरू झाल्याचं या लोकसभा निवडणुकीने ठळकपणे दाखवून दिले. राज्यातल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या घराणेशाहीला जनतेने साफ नाकारले, कॉंग्रेसने हे समजून घेण्याची आवश्‍यकता आहे. विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेससोबत आघाडी करायची का? याबाबतचा निर्णय पक्षाच्या बैठकीत होईल. मात्र या पुढे कॉंग्रेसला वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा करताना समसमान पातळीवर येऊन बोलावे लागेल. कारण कॉंग्रेससोबतच राजकारणातली गुलामीची व्यवस्था संपली आहे. 

वंचित बहुजन आघाडीने जवळपास 14 टक्‍के मते घेतली, हे आमचे यशच आहे. कॉंग्रेस राज्यात समूळ नष्ट झाली, त्याला वंचित बहुजन आघाडीच जबाबदार असा शिक्‍का मारला जातोय, तो चुकीचा आहे. कॉंग्रेस त्यांच्या कर्तृत्वाने नष्ट झाली आहे. राजकीय पक्ष म्हणून आमची जागा तयार करण्याचा आम्हाला अधिकार आहे. मात्र कॉंग्रेसला आधार देण्याचा मक्‍ता आम्ही घेतलेला नाही. या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे उच्चाटन होण्याचे कारण मागच्या पाच वर्षांत ती अजिबात कुठेच शिल्लक नव्हती. निवडणूक लढवण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडे उमेदवार नव्हते. त्यांच्याकडे जिथे उमेदवार नाहीत त्या जागा आम्हाला देण्याची मागणी त्यांनी फेटाळली. कॉंग्रेसचे किती उमेदवार निवडून आले? बाहेरून आलेल्या उमेदवारांपैकी एक उमेदवार निवडून आला. कॉंग्रेसने स्वत:च स्वत:ला संपवले आहे. 

राज्यात विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन मतपत्रिकेवर निवडणूक लढवली जावी, यासाठी आग्रह धरण्याची आवश्‍यकता आहे. किंबहुना त्यासाठी देशपातळीवर आंदोलनाची आवश्‍यकता आहे. महाराष्ट्रातील निवडणुकीपासूनच मतपत्रिका पुन्हा आणण्याची आवश्‍यकता आहे. ईव्हीएम ही टेक्‍नॉलॉजी आहे आणि कुठलं तंत्र निकामी करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान येतच असतं.

घरातला ओव्हन जर आपण दूर कुठूनही चालू, बंद करू शकतो, तर ईव्हीएम का नाही? जपानसारख्या इलेक्‍ट्रॉनिक्‍समध्ये क्रांती केलेल्या देशात जर मतपत्रिकेवर निवडणुका होत असतील तर भारतात का नको? मतपत्रिकेवर निवडणूक होणार नसतील तर सहभाग घ्यायचा नाही अशी भूमिका सर्व राजकीय पक्षांनी घेऊन त्यावर ठाम राहण्याची आवश्‍यकता आहे. 

(शब्दांकन : दीपा कदम)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: बुमराहशी जो नडला, त्याला आम्ही गाडला! शुभमन गिल अन् झॅक क्रॉली यांच्यात बाचाबाची, काय घडलं? Video

IND vs ENG 3rd Test: भारताकडे '०' धावांची आघाडी; ११ धावांत गमावले ४ बळी, कसोटीत असे केव्हा घडले अन् निकाल काय लागला होता?

Sanjay Gaikwad Imtiaz Jaleel Clash: ‘’तुला तर असं मारेन..असं मारेन की, परत तू...’’ ; संजय गायकवाडांनी आता इम्तियाज जलील यांना भरला दम!

'मला भारताकडून पुन्हा कसोटी क्रिकेट खेळायचे आहे'; अजिंक्य रहाणेची मन की बात! इंग्लंडमधून निवड समितीला पाठवला मॅसेज

IND vs ENG 3rd Test: भारताने ५० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला! रवींद्र जडेजा थेट गॅरी सोबर्स यांच्या पंक्तीत बसला, जगात दोघंच खेळाडू असे करू शकलेत

SCROLL FOR NEXT