Rajendra-Nimbhorkar 
संपादकीय

कारगिल युद्धावेळी हवाई दलाचा वापर केला असता तर...

सकाळ वृत्तसेवा

लेफ्टनंट जनरल (निवृत्त) राजेंद्र निंभोरकर
कारगिल युद्ध आणि त्यात मिळविलेला विजय, याचे स्मरण करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते; ती म्हणजे या युद्धावेळी हवाई दलाचा वापर झाला नाही. त्या वेळी हवाई दलाचा वापर केला गेला असता, तर युद्धात जास्त जवान धारातीर्थी पडले नसते. म्हणूनच, कारगिलवेळी हवाई दलाचा वापर न करणे ही चूक होती. सर्जिकल स्ट्राइक करून हवाई दलाचा वापर कशाप्रकारे करून घेता येतो, हे आपण आता दाखवून दिले आहे.

कारगिल युद्धावेळी खूप कमतरता होती. गाड्या नव्हत्या, पुरेसा दारूगोळा नव्हता. त्यामुळे ऐनवेळी महागड्या दरात साधनसामग्री खरेदी करावी लागली. पाकिस्तान पुरेशा शक्तीनिशी आपल्यावर तुटून पडला होता.

भारतापासून कारगिलला तोडण्याचा प्रयत्न करताना त्यांना राष्ट्रीय महामार्ग १ ताब्यात घ्यायचा होता. त्यासाठी ते जोरदार हल्ले करीत होते. या काळात मी नौशेरा सेक्‍टरमध्ये असताना एक बाँब फुटला आणि त्याचा एक तुकडा माझ्या छातीत गेला होता. गंभीर जखमी झालो; पण सुदैवाने बचावलो. हे युद्ध म्हणजे आव्हान होते. परंतु, युद्धसामग्रीची कमतरता असूनही भारतीय सैन्याने इच्छाशक्तीच्या जोरावर हे युद्ध जिंकले.

लष्करातील सामग्रीची स्थिती २०१६ पर्यंत खराब होती. परंतु, उरीतील घटनेनंतर स्थिती बदलली. पंधरा हजार कोटींची खरेदी केली गेली. तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी खरेदीचे स्वातंत्र्य दिले. दहा दिवस युद्ध चालले, तर त्यासाठी लागेल तेवढी सामग्री घेण्याची मुभा लष्कराला मिळाली. आता लष्कर पूर्ण तयारीनिशी सज्ज असेल. कारण नवीन रायफली, थर्मल इमेजर, अत्याधुनिक तंत्रज्ञानाची दर्जेदार युद्धसामग्री, दारूगोळा, नवी हत्यारे सैन्य दलाकडे आहेत. आता कोणत्याही लढाईसाठी भारतीय सैन्य दल तयार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : काय चाललंय? धबधब्याखाली दोन मुले आक्षेपार्ह अवस्थेत, लोकांच्या माना लाजेने खाली, सार्वजनिक ठिकाण तरी सोडा रे...

Chakan MIDC : चाकण एमआयडीसी परिसरात वर्तुळाकार बससेवा, पीएमपी प्रशासनाचा निर्णय; अध्यक्षांकडून पाहणी

Vlogger of the Year: लोहार यांचा व्लॉगर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मान

Indrayani River : ‘इंद्रायणी-पवना सुधार’ निविदेसाठी सल्लागार, चार महिन्यांत कार्यवाहीनंतर काम सुरू होणार; ‘पीएमआरडीए’ची माहिती

Solapur: डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरणी डॉ. उमा वळसंगकरांचा मनीषा मानेंविरुद्ध नवा अर्ज; आर्थिक अपहारप्रकरणी गुन्हा दाखल करा

SCROLL FOR NEXT