बदलती गावे : चिकूमुळे ओळख पोहोचली सातासमुद्रापार
बदलती गावे : चिकूमुळे ओळख पोहोचली सातासमुद्रापार 
संपादकीय

बदलती गावे : चिकूमुळे ओळख पोहोचली सातासमुद्रापार

प्रसाद जोशी

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यापासून १५ किलोमीटर अंतरावरील घोलवड गाव. समुद्रकिनारी वसलेल्या या गावाचा प्रमुख व्यवसाय आहे बागायती शेती आणि पर्यटन. या गावाची खास ओळख असलेले ‘घोलवडचे चिकू’ फक्त महाराष्ट्रातच नाही, तर जगभरात प्रसिद्ध आहेत. वाडवळ, भंडारी, आदिवासी, माच्छी, पारसी, ब्राह्मण, बारी, जैन अशी या गावाची वैविध्यपूर्ण समाजरचना आहे. चिकूच्या बागा मोठ्या प्रमाणात आहेत. विशेष म्हणजे येथील चिकू ‘जिआॅग्राफिकल इंडेक्स’ मानांकनप्राप्त आहेत.

घोलवड, बोर्डीत चिकू उत्पादनाची उलाढाल वार्षिक ३५० कोटी रुपयांच्या वर आहे. पोर्तुगाल काळात चिकू लॅटिन अमेरिकेतील ब्राझीलहून भारतात आला. हळूहळू त्याचा विस्तार गोवा, कोलकाता आणि नंतर मुंबई परिसरात झाला. गोव्यात चिकू लागवडीचा प्रयोग यशस्वी झाल्याने इराणी कावसजी पटेल यांनी १९०१ मध्ये घोलवड येथे चिकूच्या लागवडीला सुरवात केली. उत्पन्न उशिराने मिळत असल्याने सुरवातीला फारसे कोणी या व्यवसायात उतरले नाहीत. पारशी मुलांना इंग्रजी शिकवणारे चिंतामण नाना पाटील आणि त्यांचे बंधू कुशा नाना पाटील यांना शिक्षणाच्या मोबदल्यात चिकूची दोन रोपे देण्यात आली आणि त्यांनी ती बोर्डी येथे लावली. घोलवड गावातदेखील चिकूच्या उत्पादनाला सुरुवात झाली खरी; मात्र १९६० पर्यंत चिकूचे फार मोठं बागायत क्षेत्र नव्हते. १९६८ मध्ये गावात वीज आली आणि बागायतदारांना विकासाच्या दृष्टीने ‘प्रकाश’वाट दिसली.

सात हजार हेक्टरात लागवड

घोलवड आणि परिसरात सद्यस्थितीत वाडवळ, बारी, ब्राह्मण, आदिवासी, भंडारी समाजाने सात हजार हेक्टर जमिनीवर चिकूची लागवड केली आहे. बरीच वर्षे चिकू मुंबईत विक्रीसाठी जायचे; मात्र त्यानंतर मध्य प्रदेश, इंदूर, दिल्ली, गुजरात या राज्यांच्या दिशेने येथील चिकूची वाटचाल सुरू झाली. येथील चिकूला जी. आय. मानांकन मिळाल्यामुळे निर्यातीला वाव मिळाला आणि दुबई, कुवेत या आखाती देशांसह इंग्लंडपर्यंत घोलवडच्या चिकूची निर्यात सुरू झाली. उत्तरोत्तर त्याची निर्यात वाढत असल्याचे दिसते. लेखिका शारदा पाटील यांनी चिकूपासून तयार करण्यात येणाऱ्या १४६ प्रकारांबाबत माहिती देणारे पुस्तक प्रकाशित केले आहे. लतिका पाटील आणि शारदा पाटील चॉकलेट, पावडर, चिप्स तयार करत आहेत. चिकूपासून फोडी, भुकटी यासह विविध पदार्थ तयार करण्यात येतात. चिकूच्या बिया काढून सुकवल्यानंतर त्यावर प्रक्रिया केली जाते.

गेल्या सात वर्षांपासून चिकू महोत्सवाचे आयोजन येथे केले जाते. चिकूपासून तयार करण्यात येणारे विविध पदार्थ या महोत्सवाचे खास आकर्षण असते. शासनाने ठोस पाऊल उचलले, तर चिकू उत्पादनातून पालघर जिल्ह्याच्या कृषी विकासाला मोठा हातभार लागणार आहे. मात्र या प्रक्रिया उद्योगात सरकारने फारसे लक्ष घातले नाही. त्यामुळे उत्पादनासाठी जरी मेहनत केली गेली, तरी पाहिजे त्या प्रमाणात फायदा होत नाही, अशी खंत येथील चिकू उत्पादक व्यक्त करतात.

परदेशातदेखील घोलवडच्या चिकूने स्थान मिळवले आहे. त्यामुळे आपसूकच पालघर जिल्ह्याला प्रगतीची झळाळी मिळत असल्याचे दिसते. चिकू उत्पादनामुळे आर्थिक उलाढालदेखील गावाच्या आणि जिल्ह्याच्या प्रगतीसाठी हातभार लावत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT