dattatray Shekatkar 
संपादकीय

कारगिल युद्ध का झाले?

सकाळ वृत्तसेवा

लेफ्टनंट जनरल (निवृत्त) दत्तात्रेय शेकटकर
कारगिल युद्ध झाल्यानंतर सैन्य दलातील सुधारणांसाठी तीन समित्या झाल्या. त्यांनी केलेल्या शिफारशींपैकी दहा टक्के कामही झालेले नाही. तीन दलांमध्ये समन्वय राहावा, यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ नियुक्त करण्याची शिफारस माझ्या अध्यक्षतेखाली समितीनेही केली होती. त्याची अंमलबजावणी झालेली नाही. तसेच, तीनही दलांच्या गुप्तचर यंत्रणा वेगवेगळ्या आहेत. तीनही दलांची एकच संयुक्त गुप्तचर यंत्रणा असावी. यामुळे तीनही दलांच्या कामामध्ये आणि कारवायांमध्येही समन्वय राहील. पण, अजूनही हे घडत नाही. माझ्या मते, युद्ध नको असेल किंवा टाळायचे असेल, तर आपली संरक्षणसिद्धता सुसज्ज असली पाहिजे. त्यासाठी सैन्य दलांतील कमतरता दूर केल्या पाहिजेत. 

कारगिल युद्ध का झाले, तर पाकिस्तानला आपल्या सैन्यातील कमतरता माहिती होत्या. अजमल कसाब पाकिस्तानातून समुद्रामागे मुंबईत आला. याचा अर्थ त्यांना कुठे कमतरता आहे, याची माहिती मिळाली होती. असे प्रकार किंवा युद्धातून काही धडे घेतले पाहिजेत. कमतरता दूर करून शत्रूराष्ट्राला सैन्य दलांची संरक्षणसिद्धता दाखवून दिली पाहिजे, तरच देशावर येणारी संकटे थांबतील. त्यासाठी सैन्यशक्ती वाढविली पाहिजे, तरुण अधिकाऱ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. नवी शस्रे घेतली पाहिजेत. अनेक अर्थसंकल्पावेळी युद्धसामग्री खरेदी करण्याचे सूतोवाच केले जाते. पण, ही सामग्री काही एका रात्रीत खरेदी करता येत नाही. ती आधीच खरेदी करून ठेवली पाहिजे. पुढील काळात युद्ध कसे, कोठे आणि कधी होईल, याचा सखोल अभ्यास केला पाहिजे. असे केले नाही, तर कारगिलसारखे युद्ध होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suresh Dhas: ''माझा मुलगा सुपारीसुद्धा खात नाही'', 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'च्या आरोपावर सुरेश धस नेमकं काय म्हणाले?

एक नायक तर दुसरी खलनायिका; टीव्हीचे गाजलेले चेहरे पुन्हा भेटीला येणार; कोण आहेत ते? प्रेक्षकांनी सांगितली नावं

Jalgaon News : खेळता खेळता हरवला जीव! जळगावात १३ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Electricity Supply: अदानी हटाव..., प्रीपेड मीटरला ग्राहकांचा नकार; महावितरण खाजगीकरणाविरोधात कॉंग्रेसचे आंदोलन

Pune Market Committee : संचालक मंडळ बरखास्त करून ईडी व इन्कम टॅक्स चौकशी करा; राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष विकास लवांडे यांची मागणी

SCROLL FOR NEXT