सप्तरंग

#MokaleVha : नैराश्यावर करा मात

स्मिता प्रकाश जोशी

‘हॅलो, नमिता कशी आहेस? तू फोन केला होतास?’’ 
‘मॅडम, मला काहीच सुचत नाहीये खूप भीती वाटते. ऑफिसच्या शेजारील बिल्डिंगमध्ये ४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले. आमच्या ऑफिसशी त्यांचा काहीही संबंध नाही. परंतु मी खूपच घाबरले आहे. काहीच काम करू नये, असे वाटते.’’

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नमिताच्या मनात आलेले विचार गेल्या दोन ते तीन महिन्यात आपल्या प्रत्येकाच्या मनात थोड्याफार फरकाने येऊन गेले असतील. यामुळे आपण खूपच तणावाखाली येतो आणि या तणावाचे वेळेवर निरसन केले नाही तर, नैराश्यासारख्या मानसिक आजाराला आपल्याला सामोरे जावे लागते. त्यामुळे आत्महत्यांचे प्रमाणही वाढले आहे. आपल्यावर येणाऱ्या ताणांचा आपल्या मनाबरोबर शरीरावरही परिणाम होतो. आपले हात-पाय थरथर कापतात, डोके जड होते. नसलेले आजार डोके वर काढतात. 

मनात सतत नकारार्थी विचार येतात आणि आपल्या जीवनात काही अर्थ नाही, असे वाटायला लागते. सर्वजण या परिस्थितीतून जात आहेत. मग हे नैराश्य सगळ्यांनाच येते का? तर नक्कीच नाही. मध्यंतरी मी माझ्या एका मैत्रिणीला फोन केला तेव्हा तिने सांगितले, ‘तिने लॉकडाऊनच्या काळात ३ ग्रंथांचे वाचन केले.’ घटना एकच आहे पण त्यावर दिल्या जाणाऱ्या प्रतिक्रिया वेगळ्या आहेत. हे कशामुळे होते, तर आपला त्या घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन. परिस्थितीचा स्वीकार करून, त्याला योग्य वळण देणे हे आपल्याच हातात असते.

आता आपल्या मनात नकारार्थी विचार येऊच नये, आपण सतत सकारात्मक विचारच करावा हे आपण कितीही म्हटले तरी शक्य नसते. आपल्या शेजाऱ्याला अथवा ऑफिसमधल्या सहकाऱ्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समजले तर आपल्याला दडपण येणारच. मग काय करायचे, तर या नकारार्थी विचारांचाही स्वीकार करायचा. त्याच-त्याच गोष्टींचा विचार करून, अनावश्यक ताण निर्माण होऊन नैराश्य येऊ नये, याची काळजी घ्यायची. 

आपल्या जवळच्या माणसाला संसर्ग झाला आहे, हे सर्वांना फोनद्वारे कळवून त्या परिस्थितीचे महाभयंकर परिस्थितीत रूपांतर करायचे नाही. कारण या भीतीचे रूपांतर नंतर नैराश्यात होते. काहीजण मात्र या घटनेकडे अगदीच दुर्लक्ष करतात. स्वतःवर त्यांचा फाजील विश्वास असतो. पण याही गोष्टी योग्य नाहीत.  

केवळ कोरोना प्रादुर्भावाच्या परिस्थितीच नाही तर इतर कोणत्याही कारणामुळे आपल्याला नैराश्य येऊ शकते. तेव्हा काही गोष्टी विचारात घेणे गरजेचे आहे.

  • नैराश्य आले आहे, याचा स्वीकार करा.
  • नेमक्या कोणत्या कारणांमुळे नैराश्य येत आहे, याचे कारण शोधा.
  • नैराश्य कमी करण्यासाठी, कोणत्या गोष्टी आपल्या नियंत्रणात आहेत आणि कोणत्या नियंत्रणामध्ये नाहीत हे शोधून काढा. 
  • ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात आहेत, त्यामध्ये बदल करा आणि ज्या नियंत्रणामध्ये नाहीत त्याचा स्वीकार करा.
  • गरज पडल्यास तज्ज्ञांची मदत घ्या.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Election 2025 First Phase Voting: बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १२१ जागांसाठी १३१४ उमेदवार निवडणुकींच्या रिंगणात!

Pune Crime : बाजीराव रस्त्यावरील खून प्रकरणातील 'त्या' अल्पवयीन आरोपींची बालसुधारगृहात रवानगी

Rahul Gandhi H Files : राहुल गांधींच्या 'एच फाइल्स'मधील मत चोरीच्या आरोपानंतर आता नवी अपडेट आली समोर!

Radha Buffalo : साताऱ्यातील ‘राधा’ म्हशीची ‘गिनेस बुक’मध्ये नोंद; जगातील सर्वांत ठेंगणी म्हैस म्हणून दखल

Online Voter Registration : ऑनलाइन मतदार नोंदणी! पदवीधरांना फुटला घाम; एक अर्ज जमा व्हायला दिवसभराची प्रतिक्षा

SCROLL FOR NEXT