सप्तरंग

#MokaleVha : नैराश्यावर करा मात

स्मिता प्रकाश जोशी

‘हॅलो, नमिता कशी आहेस? तू फोन केला होतास?’’ 
‘मॅडम, मला काहीच सुचत नाहीये खूप भीती वाटते. ऑफिसच्या शेजारील बिल्डिंगमध्ये ४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले. आमच्या ऑफिसशी त्यांचा काहीही संबंध नाही. परंतु मी खूपच घाबरले आहे. काहीच काम करू नये, असे वाटते.’’

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नमिताच्या मनात आलेले विचार गेल्या दोन ते तीन महिन्यात आपल्या प्रत्येकाच्या मनात थोड्याफार फरकाने येऊन गेले असतील. यामुळे आपण खूपच तणावाखाली येतो आणि या तणावाचे वेळेवर निरसन केले नाही तर, नैराश्यासारख्या मानसिक आजाराला आपल्याला सामोरे जावे लागते. त्यामुळे आत्महत्यांचे प्रमाणही वाढले आहे. आपल्यावर येणाऱ्या ताणांचा आपल्या मनाबरोबर शरीरावरही परिणाम होतो. आपले हात-पाय थरथर कापतात, डोके जड होते. नसलेले आजार डोके वर काढतात. 

मनात सतत नकारार्थी विचार येतात आणि आपल्या जीवनात काही अर्थ नाही, असे वाटायला लागते. सर्वजण या परिस्थितीतून जात आहेत. मग हे नैराश्य सगळ्यांनाच येते का? तर नक्कीच नाही. मध्यंतरी मी माझ्या एका मैत्रिणीला फोन केला तेव्हा तिने सांगितले, ‘तिने लॉकडाऊनच्या काळात ३ ग्रंथांचे वाचन केले.’ घटना एकच आहे पण त्यावर दिल्या जाणाऱ्या प्रतिक्रिया वेगळ्या आहेत. हे कशामुळे होते, तर आपला त्या घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन. परिस्थितीचा स्वीकार करून, त्याला योग्य वळण देणे हे आपल्याच हातात असते.

आता आपल्या मनात नकारार्थी विचार येऊच नये, आपण सतत सकारात्मक विचारच करावा हे आपण कितीही म्हटले तरी शक्य नसते. आपल्या शेजाऱ्याला अथवा ऑफिसमधल्या सहकाऱ्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समजले तर आपल्याला दडपण येणारच. मग काय करायचे, तर या नकारार्थी विचारांचाही स्वीकार करायचा. त्याच-त्याच गोष्टींचा विचार करून, अनावश्यक ताण निर्माण होऊन नैराश्य येऊ नये, याची काळजी घ्यायची. 

आपल्या जवळच्या माणसाला संसर्ग झाला आहे, हे सर्वांना फोनद्वारे कळवून त्या परिस्थितीचे महाभयंकर परिस्थितीत रूपांतर करायचे नाही. कारण या भीतीचे रूपांतर नंतर नैराश्यात होते. काहीजण मात्र या घटनेकडे अगदीच दुर्लक्ष करतात. स्वतःवर त्यांचा फाजील विश्वास असतो. पण याही गोष्टी योग्य नाहीत.  

केवळ कोरोना प्रादुर्भावाच्या परिस्थितीच नाही तर इतर कोणत्याही कारणामुळे आपल्याला नैराश्य येऊ शकते. तेव्हा काही गोष्टी विचारात घेणे गरजेचे आहे.

  • नैराश्य आले आहे, याचा स्वीकार करा.
  • नेमक्या कोणत्या कारणांमुळे नैराश्य येत आहे, याचे कारण शोधा.
  • नैराश्य कमी करण्यासाठी, कोणत्या गोष्टी आपल्या नियंत्रणात आहेत आणि कोणत्या नियंत्रणामध्ये नाहीत हे शोधून काढा. 
  • ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात आहेत, त्यामध्ये बदल करा आणि ज्या नियंत्रणामध्ये नाहीत त्याचा स्वीकार करा.
  • गरज पडल्यास तज्ज्ञांची मदत घ्या.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

T20 World Cup 2024: 'हार्दिकच्या जागेसाठी मोठी चर्चा, तर सॅमसन...', टीम इंडिया निवडीवेळी काय झालं, अपडेट आली समोर

LSG vs MI IPL 2024 Live : नेहलची झुंजार खेळी, टीम डेव्हिडची हाणामारी; मुंबईनं लखनौसमोर ठेवलं 145 धावांचे आव्हान

Covishield Vaccine : शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका अन् हृदयासह मेंदूवर दुष्परिणाम; कोविशिल्ड लशीमुळे होणारा TTS काय आहे?

KL Rahul T20 WC 2024 : शुन्य दिवसांपासून... भारतीय संघाची घोषणा होताच लखनौने वगळलेल्या केएलसाठी केली पोस्ट

SCROLL FOR NEXT