All-Is-Well 
सप्तरंग

चुकांची बोच लागू द्या

सकाळ वृत्तसेवा

चेतना तरंग - श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग
एक भक्त एकदा मला म्हणाला, ‘‘माझी चूक झाली असेल, तर मला माफ करा.’’ मी त्याला म्हणालो, ‘‘तुला माफ का करावे? तुम्ही माफ करायला सांगताय कारण तुम्हाला बोच लागली आहे आणि त्यापासून मुक्ती हवी आहे, हे खरे आहे ना? ही बोच असू द्या. ती असल्यामुळे ती चूक पुन्हा होणार नाही. माफ करण्याने टोचणी निघून जाईल. तुम्ही तीच चूक पुनःपुन्हा करत राहाल.’’ 

तुम्हाला चूक ही चूक आहे, हे कसे कळते?
ज्यामुळे बोच लागते ती चूक आहे. तुमच्या मनाला अशी बोच लागली नाही, तर ती पूर्ण चूक असू शकत नाही. चेतनेला या टोचणीचा वैताग येतो आणि मग चेतना चुकीची पुनरावृत्ती थांबवते. अपराधीपणाबरोबर न राहता टोचणीबरोबर राहा. हे अगदी सूक्ष्म संतुलन आहे. दोषाची भावना ही विशिष्ट कृतीबद्दल, तर बोच विशिष्ट परिणाम किंवा प्रसंगाबद्दल असते. तुम्ही जे केले आहे, फक्त त्याबद्दलच तुम्हाला अपराधी वाटते, जे घडले त्याबद्दल नाही.

पण तुमच्यामुळे किंवा दुसऱ्या कुणामुळे काही घडले, ते तुमच्या बोलण्याचे कारण होऊ शकते. मनाची, चेतनेची वृत्ती ओळखून आणि त्या विशिष्ट घटनेकडे पाहण्याचा व्यापक दृष्टिकोन ठेवून, सुज्ञपणाने तुम्ही दोषावर मात करू शकता.

आपण आपल्या चुकांपासून बोच न लागता काही शिकू शकतो. शिकणे हे बुद्धीच्या स्तरावर असते. त्याचवे ळी बोच ही भावनेच्या स्तरावर अनुभवा. भावनेचा जोर हा बुद्धीच्या जोरापेक्षा खूप अधिक असतो, म्हणूनच टोचणे पुन्हा चूक होऊ देत नाही. बुद्धीच्या स्तरावर आपला ताबा असतो तिथे आपल्याला दोषी वाटते. पण बोच ही भावनेच्या जोरापेक्षा खूप जास्त असते म्हणूनच बोच पुन्हा चूक होऊ देत नाही.

तुम्हाला फक्त तुमची भावना एकटीच चालवू शकत नाही. बुद्धिमत्ता ही भावनांवर नियंत्रण ठेवण्याचे काम करते. तुमच्या भावनांसाठी तुमची बुद्धिमत्ता एक अडसर म्हणून कार्य करते. त्यामुळे चुकांची बोच लागू द्या. ती लागल्याने जागरूकता येईल, की झाले ते तुमच्या क्षमतेच्या पलीकडचे होते. ही जागृती तुम्हाला समर्पणाकडे नेईल. समर्पण तुम्हाला दोषातून मुक्त करेल. बोचणीकडून सजगतेकडे, सजगतेकडून समर्पणाकडे आणि समर्पणाकडून मुक्तीकडे अशा उत्क्रांतीकडे जाण्याच्या पायऱ्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

Accident News: देव तारी त्याला...! पाच मजली इमारत कोसळूनही तीन महिन्यांची चिमकुली सुखरुप बचावली, 27 जणांचा मृत्यू

Latest Maharashtra News Updates : लोकांच्या घरी होळ्या पेटवून पोळ्या भाजण्याचा भाजपाचा धंदा - उद्धव ठाकरे

Mutual Fund: 3,000 रुपयांची SIP की 3 लाख रुपयांची Lumpsum: 30 वर्षांनंतर कोण देणार जास्त परतावा?

Nagpur Crime: नागपूर हादरलं! प्रियकराच्‍या मदतीने पतीचा खून; उत्तरीय चाचणीच्या अहवालातून खुलासा

SCROLL FOR NEXT