Chitana-Tarang
Chitana-Tarang 
सप्तरंग

अनिश्‍चिततेबद्दल निश्‍चित राहा...

सकाळ वृत्तसेवा

चेतना तरंग - श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग
प्रश्‍न - दुःस्वप्नाबद्दल काय सांगाल?
गुरुदेव -
 तुम्ही स्वप्ने पाहत असतानाच दुःस्वप्नांना सत्य मानण्याची चूक होते. विचार करा की तुमचे जागृत सत्य हेही स्वप्न आहे. मग तुम्ही सत्याप्रति जागृत व्हाल. माया म्हणजे समजुतीचा अभाव आणि माया ही माया आहे, ही जाणीव म्हणजे ज्ञान. आपला जगाबद्दलचा अनुभव हा चुकीच्या समजावर आधारित असतो म्हणून आपला जगामधला अनुभव हीदेखील माया आहे. म्हणून प्रत्येक अनुभव डोके सुन्न करणारा आणि बुद्धी झाकोळून टाकणारा असतो. अनुभव घेणारा हेच खरे सत्य आहे. अनुभवांमधून अनुभवणाऱ्याकडे पहा. या क्षणी उठा. डोक्यातील जुने अनुभव झटकून टाका आणि शुद्ध अस्तित्व पहा. जो मी आहे तेच तुम्ही आहात.

प्रश्‍न - तुम्ही अनुभव आणि अनुभवकर्ता यात फरक कसा कराल?
गुरुदेव -
 तुम्ही खरोखर इथे आहात का? तुम्ही ऐकत आहात का? आता तुमचे डोळे मिटा आणि पहा कोण ऐकत आहे. कोण प्रश्‍न विचारते आहे? कोण बसले आहे आणि कुणाला काय हवे आहे? कोण गोंधळून गेला आहे? हा कोण अनुभव घेणारा आहे.

विवेक म्हणजे तारतम्याने पाहणे. ज्ञान म्हणजे सर्व काही बदलते आहे, याची जाणीव. वेळोवेळी तुम्हाला ही जाणीव व्हायला हवी की जग, लोक, तुमचे शरीर, तुमच्या भावना सारे सतत बदलत असते. तुम्ही दुःख अनुभवता तेव्हा समजा की विवेक झाकोळून गेला आहे. तुम्हाला चेतनेची निश्चितता लक्षात येते तेव्हा तुम्ही जगाच्या अनिश्‍चिततेबद्दल स्वस्थ राहू शकता, बहुतेक वेळा लोक अगदी याच्याविरुद्ध करतात. जगातील गोष्टींबद्दल ते निश्‍चित असतात आणि देवाबद्दल अनिश्‍चित. ते अविश्‍वसनीय गोष्टींवर विश्‍वास ठेवतात आणि बैचेन होतात. अनिश्‍चितता स्थिरतेची आस निर्माण करते आणि संपूर्ण विश्‍वात सर्वांत स्थिर गोष्ट आहे - आत्मा. जग परिवर्तनशील आहे; आत्मा अपरिवर्तनशील आहे. तुम्ही अपरिवर्तनावर विश्‍वास ठेवला पाहिजे आणि परिवर्तनाचा स्वीकार केला पाहिजे. सर्व अनिश्‍चित असते याबद्दल तुम्ही निश्‍चिंत असाल, तर तुम्ही मुक्त झालात. तुम्ही अज्ञानामुळे अनिश्‍चिततेवरच विश्‍वास ठेवाल तेव्हा तुम्ही चिंताग्रस्त आणि तणावपूर्ण व्हाल. सजगतेबद्दल खात्री नसेल तर चेतना उच्च स्तरावर येते. सोबत स्मितही आणते. सहसा लोकांना वाटते की निश्‍चितता म्हणजे मुक्ती आहे. तुम्ही अनिश्‍चित असताना तुम्हाला अशी मुक्ती जाणवली, तर ती ‘खरी’ मुक्ती. बहुतेक वेळा तुमची निश्‍चिती किंवा अनिश्‍चित सापेक्ष जगावर आधारित असते. सापेक्षतेच्या अनिश्‍चिततेवर निश्‍चित असणे हेच तुम्हाला परमात्म्याच्या अस्तित्वाबद्दल निश्‍चिंत बनवते आणि परमात्म्यावर एक ‘निश्‍चित’ श्रद्धा आणते. 

प्रश्‍न - आपण अनिश्‍चित असतो तेव्हाही आपण उत्साही राहू शकतो का?
गुरुदेव -
 हो, ज्ञानाच्या बाबतीत अनिश्‍चिततेबद्दल तुम्ही उत्साही राहू शकाल. सहसा अनिश्‍चित असतात ते कृती करत नाहीत, ते फक्त बसून वाट बघतात. अनिश्‍चिततेमध्ये कृती केल्याने आयुष्य एक क्रीडा बनते व आव्हानात्मक बनते. सापेक्ष जगाबद्दल निश्‍चितता, निरुत्साह निर्माण करते. स्वतःबद्दलची अनिश्‍चितता भय निर्माण करते. भौतिकतेबद्दल अनिश्‍चितता चेतनेविषयी निश्‍चितता आणते. अनिश्‍चिततेत राहणे म्हणजे सोडून देणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT