सप्तरंग

थॉट ऑफ द वीक : विश्वासात हवा डोळसपणा

सुप्रिया पुजारी

अपेक्षा व त्या न पूर्ण झाल्यामुळे होणारा गोंधळ आपण जाणून घेतला, तसेच तुलना केल्याने अपेक्षाभंग हा निश्चितच आहे. अपेक्षा व अपेक्षाभंग या चक्रामध्ये आपला वेळ वाया जातोच; पण विचारांची दिशाही भरकटत जाते. अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे कधी स्वतःला, तर कधी दुसऱ्याला दोष देण्याची प्रवृत्ती, असमाधान यांसारखी अनेक आव्हाने येत राहतात. ‘तुलने’नंतर अपेक्षाभंगामागील आणखी एक उगम म्हणजे ‘अंधविश्वास.’ या अंधविश्वासाचे अनेक पैलू आहेत. कधी स्वतःवरचा अंधविश्वास, कधी जवळच्या लोकांवरचा अंधविश्वास, कधी ऐकीव गोष्टींवर अंधविश्वास. थोडे  बारकाईने पाहिले, तर स्वतःच्या विचारांवरही हा अंधविश्वास येतो. तुम्ही या अंधविश्वासात जगत आहात का, हे तपासू. खालील प्रश्न आत्मपरीक्षण करण्यास मदत करतील.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

  • मला कायम दुसऱ्यांचे विचार, धोरण, अपेक्षा चुकीच्या वाटतात.
  • मला कायम माझेच, माझ्यासारखेच व मला पटणारेच विचार योग्य वाटतात.
  • मला सतत कोणीतरी महत्त्व द्यावे, असे वाटते.
  • मला कधीच, कोणीच समजून घेत नाही, असे वाटते.
  • मला कायम दुसऱ्यांनीच बदलावे, असे वाटते.

वरील प्रश्नांची उत्तरे ‘हो’ असतील, तर नक्कीच तुम्ही कोणत्यातरी अंधविश्वासामध्ये वावरत आहात. या सर्व प्रश्नांमध्ये ‘कधीच’, ‘कायम’ हे शब्द अतिरेक दर्शवतात. सतत दुसऱ्यांना दोष देण्याची वृत्ती हा अंधविश्वास निर्माण करतो. परिणामी, आपण कधीतरी चुकू शकतो, वेगळे विचारही बरोबर असू शकतात, हे लक्षात येत नाही व दुसऱ्यांकडून अपेक्षा वाढत जातात. समोरच्याने कितीही अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, तरी कुठेतरी ते कमीच पडतात, असे वाटते. हा अंधविश्वास दूर करण्यासाठी स्वजागरूकता महत्त्वाची. हा अंधविश्वास दूर कसा करायचा, ते पाहू.

1) स्वतःबरोबर प्रामाणिक राहा
आपण आपल्या क्षमतेचा काळजीपूर्वक विचार करतो, तेव्हा आपण आपल्या मर्यादा ओळखण्यास सुरुवात करतो. कधी आपण चुकलो आहोत, असे वाटले; तर ते प्रामाणिकपणे स्वीकारा. क्षमता ओळखून ती प्रथम स्वीकारणे हेच अंधविश्वास सोडून आत्मविश्वास मिळवायचे पहिले पाऊल आहे.

2) इतरांचे विश्व स्वीकारा
तुमचे विश्व हे तुमचे विचार, मत, भावना, पूर्वानुभव व दृष्टिकोनाने बनलेले असते. तुमच्यासारखेच इतरांचेही विश्व असते. त्यामध्ये तुमच्यापासून विचार, मत, भावना, पूर्वानुभव व दृष्टिकोन वेगळे असू शकतात, हे स्वीकारणे. यामुळे अपेक्षाही योग्य होतील. अंधविश्वास व आत्मविश्वास, यातील हाच फरक आहे.

3) काल्पनिक जग व वास्तव, याचे भान
आदर्शाचा अतिरेकसुद्धा अपेक्षाभंग करतो. काल्पनिक जग किंवा काल्पनिक आदर्श समोर ठेवल्याने आपण वास्तवापासून खूप लांब जातो. त्यापेक्षा कोणतीही परिस्थिती ‘आहे तशी’ पाहणे व ती स्वीकारण्यासाठी आपण काय करायला हवे, याचा विचार अधिक समाधानकारक ठरतो.

4) ऐकणे व बोलणे यातील समतोल
स्वतःवरील अंधविश्वास हा तुम्हाला ‘अधिक बोलणारी’ व दुसऱ्याचे ‘कमी ऐकणारी’ व्यक्ती बनवितो. ‘शेवटचा शब्द माझा असावा’ ही गरज इतकी दृढ होते, की समोरच्याचे पूर्णपणे ऐकून घेण्याची क्षमता नाहीशी होते. परिणामी, अपेक्षासुद्धा बोलल्या जातात, ऐकल्या जात नाहीत. एकमेकांच्या अपेक्षांच्या व्याख्या जाणून घेण्यासाठी ऐकणे व बोलणे, यातील समतोल महत्त्वाचा असतो.

वरील मुद्दे तुम्हाला स्वतःच्या व इतरांच्या अपेक्षा अधिक चांगल्या रीतीने हाताळण्यासाठी उपयुक्त ठरतील. लक्षात ठेवा, जितके लवकर अंधविश्वास बाजूला ठेवून तुम्ही दुसऱ्याचे जग स्वीकाराल, तितके लवकर तुमचेही जग स्वीकारले जाईल व अपेक्षाभंग होणार नाही. पुढील लेखात आपण अपेक्षाभंगावरचे उपाय पाहू.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: अर्धशतकवीर पोरेलपाठोपाठ ऋषभ पंतही झाला बाद, दिल्लीचा निम्मा संघ परतला माघारी

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT